इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०१६

पर्यटनवाढीसाठी पर्यटकांना सवलती देणार - पालकमंत्री चंद्रकांत पाटील




25 डिसेंबर ते 15 जानेवारी या काळात कोल्हापूर पर्यटन महोत्सव
कोल्हापूर दि. 16 : जिल्ह्यात पर्यटन क्षेत्रात मोठ्याप्रमाणात संधी असून पर्यटन वाढले की त्यामध्यमातून जिल्ह्याची श्रीमंती वाढेल त्यासाठी पर्यटन क्षेत्राला चालना देण्याच्या दृष्टीने 25 डिसेंबर ते 15 जानेवारी या काळात कोल्हापूर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. या काळात येणाऱ्या पर्यटकांना पर्यटन खर्चात 50 टक्के सुट देण्यात येईल. पर्यटनासाठी उत्तम प्रतीच्या लक्झरी बसेस उपलब्ध करुन देण्यात येतील त्याचा खर्च शासन देईल. शॉपिंगसाठी सुट रक्कमेचे कुपन त्या कुपनांवर लॉटरी आदी सर्व बाबींचे पॅकेज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज घोषित केले.
          कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या प्रेरणेने आणि कोल्हापूर हॉटेल मालक संघाच्यावतीने फॅम टुर आयोजित केली होती. महाराष्ट्र राज्यातील प्रमुख टुर ऑर्गनायझरर्स असोसिएशनच्या सभासदांना कोल्हापूरच्या वैभवशाली निसर्ग संपन्नतेचा, इतिहासाचा, कलेचा, लोक परंपरेचा परिचय करुन देण्याकरीता ही फॅमिलरायझेशन टुर म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची पर्यटन सहल 14 ते 16 ऑक्टोबर 2016 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. शेवटच्या दिवशी शाहू स्मारक भवन येथे आयोजित परिसंवादात पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, जिल्हाधिकारी डॉ अमित सैनी, महानगर पालिकचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ कुणाल खेमणार, जेष्ठ विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार, मुख्य वनसंरक्षक श्री राव, महाराष्ट्र टूर ऑर्गनायझरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर पाटील, उपाध्यक्ष प्रभुलाल जोशी, सहसचिव चिमण मोटा, कोल्हापूर हॉटेल मालक अशोसिएशनचे उज्वल नागेशकर, शाहु स्मारक ट्रस्टचे सचिव विवेक आगवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
          कोल्हापूर श्रीमंत करण्यासाठी पर्यटन क्षेत्राला चालना देणे आवश्यक असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या नकाशामध्ये कोल्हापूरचा समावेश नसणे ही बाब गंभीर असल्याचे सांगून त्याबाबत तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कोल्हापूरात महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणारा पर्यटक तीन चार दिवस थांबावा यासाठी शहर आणि जिल्ह्यात चार-पाच पर्यटन स्थळे नव्याने विकसित करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण प्रयत्नशिल असून यामध्ये महापौरांनी पुढाकार घ्यावा, त्यासाठी लागणारी नाहरकत प्रमाणपत्रे त्वरीत उपलब्ध करुन द्यावीत. पर्यटन विकासाच्यादृष्टीने गाईडसाठी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची इत्यंमभुत माहिती देणारा अभ्यासक्रमाची रचना करुन त्यांना प्रशिक्षित केले जाईल. कोल्हापूर पर्यटन महोत्सव 25 डिसेंबर ते 15 जानेवारी या कालावधीत घेण्यात येणार असून या काळात येणाऱ्या पर्यटकांना टूर खर्चात 50 टक्के सुट देण्यात येईल. टूर ऑपरेटर्सना प्रत्येक पर्यटकामागे चांगला इन्सेटिव्ह देण्यात येईल. पुढील दोन-तीन वर्षे या क्षेत्रात शासन गुंतवणूक करेल आणि पर्यटन क्षेत्राला चालना देईल. त्यांचाच एक भाग म्हणून जिल्हास्तरावर लवकरच एक समिती स्थापन करण्यात येऊन ही समिती पॅकेज, स्थळे, आवश्यक सुविधा यांचा आराखडा तयार करेल.
जिल्हाधिकारी डॉ अमित सैनी म्हणाले, कोल्हापूरात पर्यटनवाढीला खुप संधी असून त्याला उभारी देण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे माहिती व आरक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. ते अधिक व्यापक व विकसित करण्यात येईल. शाहु स्मारक भवन पर्यटन व संस्कृतीक हब म्हणून विकसित करण्यात येईल. जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी जिल्हा परिषदेची मोठ्याप्रमाणावर मदत घेण्यात येईल. त्यांच्या सहाय्याने पर्यटकांसाठी चेंगिंग रुम, शौचालये आदि सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.
 महाराष्ट्र टूर ऑर्गनायझरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी कोल्हापूरात पर्यटनाच्या दृष्टीने अनुकुलता असून कोल्हापूर आत्ता जसे आहे तसे ते प्रमोट करायला सुरुवात करा, हे आहे ते घेऊन जगासमोर जा, असे सांगून सध्या कोल्हापूरचे पर्यटन क्षेत्र मार्केटिंगमध्ये कमी पडते, त्यातील त्रुटी व कोल्हापूरला प्रमोटर करण्यासाठी महाराष्ट्र टूर ऑर्गनायझरर्स असोसिएशन सर्वोतपरी मदत करेल असे सांगितले. कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी टूररिझम पॉलीसी 2016 ची आखणी करण्यात आली असून तीची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात दरवर्षी 60 लाख पर्यटक येतात सुमारे सात हजार रुम्स निवासासाठी उपलब्ध असून साठ टक्के पर्यटक जरी निवासी राहिले तरी त्यातून तीनशे ते चारशे कोटी महसूल जमा होतो. रिक्षा, हॉटेल, लॉन्ड्री अदींच्या व्यवसायात वाढ होते. त्यासाठी अधिक चांगले नियोजन आवश्यक आहे.
राज्यात कोल्हापूर चांगले पयर्टनस्थळ असून ते व्यवस्थित प्रमोट होणे आवश्यक आहे. पब्लीक प्रायव्हेट पार्टनशिप विकसित होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यालय आद्यावत होणे, दिशा दर्शक फलक, वाहतुक व्यवस्थापन, गाईड लिस्ट, उत्तम प्रतीची छायाचित्रे, उत्तम दर्जाच्या जाहिराती यांच्या मध्यमातून पर्यटन विकासाला गती देता येईल असेही सुधीर पाटील यांनी सांगितले.
डॉ जयसिंगराव पवार यांनी जिल्ह्याला इतिहासाचा तेजस्वी वारसा आहे. किल्ले, धरणे, वने यामुळे जिल्हा समृध्द आहे. त्याचे व्यवस्थित मार्केंटिग होणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उज्वल नागेशकर यांनी केले. सुत्रसंचालन चारुदत्त जोशी यांनी केले.

00000

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०१६

पर्यटन स्थळांच्या परिचय सहलीमुळे कोल्हापूर पर्यटन विकासाला नवी चालना मिळेल जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी





महाराष्ट्र टुर ऑर्गनायझर असोसिएशनचे सभासद लावण्यसंध्या कार्यक्रमाने भरावले
        कोल्हापूर दि. 14 : कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र टुर ऑर्गनायझर असोसिएशनच्या सभासदाकरीता आयोजित केलेल्या जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची परिचय सहल उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आज येथे बोलताना व्यक्त केला.
            राज्यातील प्रमुख टुर ऑर्गनायझरर्स असोसिएशनच्या सभासदाकरिता दि. 14 ते 16 ऑक्टोबर 2016 या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची सहल आयोजित केली आहे. त्या निमित्ताने  कोल्हापूरच्या मराठमोळ्या कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम शाहू स्मारक भवन हॉल येथे संपन्न झाला. या सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याहस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्यास महाराष्ट्र टुर ऑर्गनायझर असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर पाटील, कोल्हापू हॉटेल संघटनेचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, उपाध्यक्ष सिध्दार्थ लाटकर, डॉ. संजय पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव यांच्यासह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या विविध टुर ऑर्गनायझशनचे पदाधिकारी/प्रतिनिधी उपस्थित होते.
            कोल्हापूरात पर्यटनाला मोठा वाव असल्याचे स्पष्ट करुन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, या जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची परिचय सहलीमुळे राज्यातील पर्यटन ऑर्गनयझर यांना कोल्हापूरच्या पर्यटनाची आणि सांस्कृतिची ओळख होईल आणि त्यांच्या पर्यटन विषयक संकल्पनाचा कोल्हापूरच्या पर्यटनाला मदत होऊन कोल्हापूरच्या पर्यटनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तीन दिवसाच्या या सहलीतून कोल्हापूरच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र टुर ऑर्गनायझर असोसिएशनच्या सभासदांकडून पर्यटन विषयक नव-नव्या संकल्पना उपयुक्त ठरतील, असेही ते म्हणाले.
            महाराष्ट्र टुर ऑर्गनायझर असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर पाटील या प्रसंगी बोलताना म्हणाले, कोल्हापूरात पर्यटन विकासाला मोठा वाव असून कोल्हापूरच्या पर्यटन विकासाला महाराष्ट्र टुर ऑर्गनायझशनचे संपूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या सहलीसाठी राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक अशा विविध जिल्ह्यातून पर्यटन स्थळांना टुर ऑर्गनायझरर्स असोसिएशनच्या सभासदांनी कोल्हापूरातील पर्यटनाची विपुल माहिती मिळेल. जणेकरुन भविष्यात कोल्हापूर जिल्ह्यात अधिकाधिक पर्यटन टुर वाढविणे शक्य होईल.
लावण्यसंध्या कार्यक्रमाने असोसिएशनचे सभासद भरावले
            महाराष्ट्र टुर ऑर्गनायझर असोसिएशनच्या सभासदांसाठी आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या आयोजित केलेल्या सहलीच्या निमित्ताने आज संध्याकाळी शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूरच्या मराठमोळ्या कलाकारांचा लावण्यसंध्या सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात कोल्हापूरच्या कलाकारांनी सादर केलेली, लोकगीत, लोकसंगीत, अभंग, भारुड, भुपाळी, जात्यावरच्या ओवी, वासुदेव, लावणी, पोवाडा अशा विविध संस्कृतिक कार्यक्रमाच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थित टुर ऑर्गनायझरचे सभासद आणि प्रेक्षक भारावून गेले.  या लावण्यसंध्या कार्यक्रमात पारंपारिक शेतकरी कुटुंबाचे राहणीमान आणि दिनचर्या यावर हा लावण्यसंध्या कार्यक्रम सादर करण्यात आला.
            महाराष्ट्र टुर ऑर्गनायझर असोसिएशनच्या सभासदांचे आज सकाळी राज्याच्या विविध जिल्ह्यातून कोल्हापूरात आगमन झाले. वृषाली हॉटेल येथे छोटीखानी सांस्कृतिक कार्यक्रमाने या पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र टुर ऑर्गनायझर असोसिएशनच्या सभासदांनी जोतिबा, पन्हाळा, महालक्ष्मी मंदिर आदी ठिकाणांना भेटी देऊन पर्यटनाची आणि संस्कृतिकची माहिती घेतली. उद्या सकाळी हे महाराष्ट्र टुर ऑर्गनायझर असोसिएशनचे सभासद गगनबावडा, राधानगरीधरण, दाजीपूर परिसर आणि धरण बॅक वॉटर, सादळे मादळे या ठिकाणांना भेटी देतील. तर रविवारी सिध्दीनगरी म्युझियम, न्यु पॅलेस म्युझियम, टाऊन हॉल म्युझियम, साठमारी या ठिकाणांना भेटी देतील. नंतर सायंकाळी 4 वाजता शाहू स्मारक भवन येथे प्रशासनाशी संवाद  साधतील.

             प्रारंभी कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे उपाध्यक्ष सिध्दार्थ लाटकर यांनी स्वागत केले. आनंत माने यांनी समारंभाचे नियोजन केले. या समारंभास महाराष्ट्र टुर ऑर्गनायझर असोसिएशनचे सभासद, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे पदाधिकारी, शाहू स्मारक भवनचे व्यवस्थापक श्री. हारुगडे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्री. देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांच्यासह अनेक मान्यवर रसिक आणि नागरिक उपस्थित होते.

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०१६

जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटनेस जिल्हा नियोजन समितीतून 18 लाखाचा निधी -पालकमंत्री चंद्रकांत पाटील





            कोल्हापूर, दि. 11 : सामाजिक परिवर्तनाचे महत्वकांशी कार्य करणाऱ्या जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटनेसाठी जिल्हा नियोजन समितीतून 18 लाखाचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना दिली.
            जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटनेच्यावतीने मंगळवार पेठ येथे बांधण्यात आलेल्या डॉ. सर्वपल्‍ली राधाकृष्णण निरीक्षण गृह इमारतीचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी खासदार संभाजीराजे छत्रपती होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर अश्विनी रामाणे, दै. पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
            जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटनेच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल समाधान व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या संस्थेच्या विविध उपक्रमांसाठी शासनाकडून सर्वती मदत केली जाईल. याबरोबरच सेवाभावी संस्था आणि व्यक्तींच्या लोकसहभागातूनही संस्थेचे विविध उपक्रम हाती घेऊन संस्थेला बळकटी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.  संस्थेचे प्रलंबित प्रश्न आणि समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली.
            याप्रसंगी बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटनेच्यावतीने सामाजिक काम केले जात असून या संस्थेच्या विकासासाठी 10 लाखाचा निधी खासदार फंडातून उपलब्ध करुन दिला जाईल. या निधीचा विनियोग संस्थेतील मुलांसाठी अद्ययावत डिजिटल लायब्ररी उभारण्यासाठी करावा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. संस्थेच्या अडीअडचणी सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
            याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटनेच्या वतीने  अनेकविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविले जात असून या पुढील काळात जिल्हा नियोजन समिती, शासन आणि दानशुर संस्था आणि व्यक्तींची मदत घेऊन नवे-नवे उपक्रम हाती घेतले जातील. संस्थेसाठी सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्तींचे त्यांनी कौतुक केले. 
            प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश शिपुरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शेवटी पद्मजा तिवले यांनी आभार मानले. समारंभास महिला व बाल विकास अधिकारी एस.डी.मोहिते, शिवाजीराव कदम, माजी महापौर भिकसेठ पाटील, व्ही.बी.पाटील यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, विद्यार्थी, पालक आणि नागरीक उपस्थित होते.
            या  प्रसंगी जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटनेच्या इमारत उभारणीसाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

000000000

सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

कोल्हापूर जिल्ह्याचे काम राज्यात आदर्श - मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय कोल्हापूरने ई-जमाबंदी प्रयोग यशस्वी करावा






            कोल्हापूर, दि. 10 : कोल्हापूर जिल्ह्याचे काम राज्यात आदर्श असून पर्यटन, विमानतळ, आरोग्य विभागातील रिक्त पदे आदी विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी  शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, असा विश्वास राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिला. तसेच ई-डिस्निक प्रणाली कोल्हापूर जिल्ह्याने यशस्वी केली असून आता यापुढे जाऊन ई-जमाबंदी प्रयोगही यशस्वी करावा, असे सांगून  26 जानेवारी पर्यंत कोल्हापूर जिल्हा 100 टक्के हागणदारीमुक्त व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या.
            जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महानगरपालिका आयुक्त पी.शिवशंकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह सर्वसंबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
            कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव असल्याचे स्पष्ट करुन स्वाधीन क्षत्रिय म्हणाले, कोल्हापूरच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी नव्या-नव्या उपाययोजना प्रशासनाने हाती घ्याव्यात. तसेच कोल्हापूरच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी विमान सेवा सुरु करण्यासाठी रिजनल कनेक्टीव्हीटी स्किम अंतर्गत यासाठी प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना त्यांनी केली. याबरोबरच महालक्ष्मी तिर्थक्षेत्र विकास आराखडा, जोतिबा परिसर विकास आराखडा यासह जिल्ह्यातील अन्य तिर्थक्षेत्र विकास आणि पर्यटन विकासाच्या योजनांना शासनस्तरावर प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने पन्हाळा लाईट व साऊंड शो याचा दर्जेदार आणि गुणात्मक आराखडा बनवावा, अशी सूचना त्यांनी केली. शाहू स्मारक भवन टुरिस्ट हब म्हणून विकसित करण्याबरोबरच अन्य पर्यटन स्थळांच्या विकासास प्राधान्य दिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी यावेळी सांगितले.   
कोल्हापूरने ई-जमाबंदी प्रणाली यशस्वी करावी- मुख्य सचिव
            कोल्हापूर जिल्ह्याने विकसित केलेल्या ई-डिस्निक प्रणालीचा संपूर्ण राज्यात आवलंब केला जात असून आता ई जमाबंदी ही प्रणाली विकसित करुन आणखी एक पाऊल पुढे टाकावे यासाठी शुभेच्छा देऊन मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याने अनेक योजना सुरु करुन त्यांची राज्यस्तरावर नोंद घेतली जाते. यामध्ये तलाठ्यांना लॅपटॉप देण्याचा प्रकल्प कोल्हापूरने सुरु केला. ई-डिस्निक प्रणाली कोल्हापूरने सुरु केली. स्वच्छता अभियानात कोल्हापूरने केलेली कामगिरी, आरोग्य विभागाचा कायपालट योजना अशा अनेकविध योजनांची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्याने केली, आणि त्या योजना राज्याने स्विकारल्या ही कोल्हापूरच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे.
            शासनाच्या सर्व योजनांसाठी आधार कार्ड लिंक करण्याच्या उपक्रमाचीही यावेळी माहिती देण्यात आली. आधारसाठी एकच खाते निश्चित करावे याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने द्यावा. त्याचा राज्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या आधारसाठीच्या कायद्यामध्ये अंतर्भाव करण्याबाबत कार्यवाही करणे सोईचे होईल, जिल्ह्यातील पुरवठा विभाग अधिक लोकाभिमुख आणि सक्षम करण्यासाठी सर्व रेशन दुकानामध्ये बायोमॅट्रीक प्रणाली सुरु करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. तसेच जिल्ह्यात तलाठी सज्जच्या ठिकाणी चावड्या उभारण्यासाठी शासनाची योजना असून या योजनेतून जिल्ह्यातील चावड्यांची उभारणी करण्याचा प्रस्ताव तात्काळ पाठवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            हागणदारीमुक्तीत कोल्हापूर जिल्ह्याने भरीव काम केल्याबद्दल समाधान व्यक्त करुन मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय म्हणाले, जिल्ह्यातील 9 नगरपालिकापैकी 8 नगरपालिका, कोल्हापूर महानगरपालिका हागणदारीमुक्त झाली असून जिल्ह्यातील 1029 गावेही हागणदारीमुक्त घोषित केली आहेत. जिल्ह्यात 4 लाख 93 हजार वैयक्तिक शौचालय असून अद्यापही 37 हजार शौचालयांची आवश्यकता आहे. 26 जानेवारीपर्यंत 100 टक्के जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदेने तसेच महानगरपालिकेने पर्यावरणपुरक गणेशोत्सवासाठी केलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले. महानगरपालिकेच्या सेफ सिटी अंतर्गत उभारलेल्या सी.सी.टी.व्ही प्रकल्पाचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.
            जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात गेल्या वर्षी 69 गावांची निवड करुन सिंचनाची व्यवस्था केली आहे. कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक कळंबा तलाव लोकसहभागातून गाळमुक्त करुन मोठा पाणीसाठा उपलब्ध झाल्याबद्दलही मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी प्रशासनाचे कौतुक केले. यंदा जलयुक्त शिवार अभियानातून 20 गावांची निवड केली असून यासाठी 622 कामांचा 30 कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार येत्या 31 मार्च अखेर जलयुक्त शिवारचे काम पूर्ण केले जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी स्पष्ट केले.
            यावेळी आरोग्य, तंत्र शिक्षण, कृषी, रस्ते विकास, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, वन, महानगरपालिका, नगरपालिका, सामाजिक अर्थ सहाय्याच्या योजना, जिल्हा खनिकर्म  विकास, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, पर्यटन, आधार लिंकिंग अशा सर्व विभागांचा मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालय आदर्श इमारत : स्वाधिन क्षत्रिय
            कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे हेरिटेज इमारत असून नवीन इमारतही अतिशय दर्जेदार उभारली असल्याचे  गौरवोदगार स्वाधीन क्षत्रिय यांनी यावेळी काढले. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी या इमारतीची पाहणी करुन विविध विभागांना भेटी दिल्या. अंतर्गत उपाययोजनांसाठी ह्दय योजनेमधून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना त्यांनी केली.
            जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांची माहिती दिली. शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी आभार मानले. या बैठकीस सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

0 0 0 0 0 0 0

कौशल्य विकासातून रोजगार निर्मिती


कुशल महाराष्ट्र रोजगार युक्त महाराष्ट्र हे ध्येय डोळयासमोर ठेऊन मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी राज्यात मेक इन महाराष्ट्र हा कार्यक्रम राबवून कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर दिला.  तरुणांना कौशल्य विकासाद्वारे कुशल आणि सक्षम करुन त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान हाती घेतले आहे. या अभियानाव्दारे राज्यात 2022 पर्यंत 4.50 कोटी मनुष्यबळाचे कौशल्य विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे.
तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे कौशल्य आधारित प्रशिक्षण देऊन उत्पादनक्षम बनवण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास कार्यक्रमास प्राधान्य दिले असून यासाठी राजय ते जिल्हापातळीपर्यंत कौशल्य विकास कार्यकारी समिती कार्यरत आहेत. प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता अभियान हे एक सर्वसमावेशक बहुअयामी अभियान असुन या अभियानांतर्गत 15 ते 45 वयोगटातील उमेदवारांचे अधिक मागणी असलेल्या क्षेत्राच्या आवश्यकतेनुसार व्यावसायिक कौशल्य विकास, कौशल्य वर्धन व पुर्न:कौशल्य विकास करुन त्यांना रोजगारक्षम बनवून त्यातील किमान 75 टक्के उमेदवारांना प्रत्यक्ष नोकरी किंवा स्वयंरोजगार मिळवून देण्यास प्राधान्य दिले आहे. शासनाच्या Web : www.mssds.in या वेबपोर्टद्वारे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील कौशल्य विकासाशी संबंधित 600 प्रशिक्षण कोर्सेस आणि त्यासंबधातील सविस्तर माहिती शासनाने वेब पोर्टलवर प्रसिद्ध केलेली आहे.
औद्योगिक क्षेत्राच्या मागणीनुसार कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा कौशल्य विकास, कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. अनेकदा औद्योगिक संस्थेला विशिष्ट प्रकारच्या कौशल्य प्राप्त मनुष्यबळाची आवश्यकता असते हे लक्षात घेऊन उद्योग घटकांना कौशल्य विकास या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी करुन घेण्यात आले असून असे उद्योग घटक स्वत: त्यांच्याकडील साधनसामुग्री वापरुन प्रशिक्षण बॅच चालू करुन हव्या असलेल्या प्रकारच्या मनुष्यबळाची प्राप्ती करुन घेवू शकतील व स्वत: प्रशिक्षण संस्था म्हणूनही काम करु शकतील. यासाठी शासनाने ILSDP हा उद्योग केंद्रीत कौशल्य विकास कार्यक्रम सुरू केलेला आहे. जिल्हा स्तरावर या योजनेची अंमलबजावणी मा. सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत करण्यात येते.
 महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेच्या बेवपोर्टवरुन उमदेवाराच्या नोंदणीपासून मुल्यमापन, समुपदेशन, प्रशिक्षण प्रशिक्षणोत्तर मुल्यमापन, प्रमाणिकरण, रोजगारोपरांत अशा अनेक बाबंीचे सनियंत्रण होणार आहे. हे पोर्टल नोंदणीकृत प्रशिक्षित उमदेवारांसाठी आजीवन करियर व्यवस्थापनाचे व्यसपीठ म्हणून भूमिका बजावेल.  राष्ट्रीय कौशल्य विकासासाठी रोजगाराची अधिकत्मक संधी असलेल्या 11 क्षेत्रांची निवड करण्यात आली असून यामध्ये बांधकाम, उत्पादन निर्माण, वस्त्रोद्योग, ऍ़टोमोटीव्ह, आतिथ्य, आरोग्य देखभाल, बॅकिंग, वित्त सेवा विमा, संघटित किरकोळ विक्री, औषधोत्पादन रसायने, माहिती तंत्रज्ञान सलंग्न आणि कृषी प्रक्रिया या क्षेत्रांचा समावेश आहे.   
प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून यासाठी जिल्ह्यातील 70 संस्थांची निवड करुन त्यांच्यामार्फत यावर्षी 2291 विद्यार्थ्यांना विविध कौशल्य प्रशिक्षणे देण्यात येत आहेत.             कौशल्य विकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामध्ये ब्युटी पार्लर, गारमेंट, सॉफ्ट  किट, इलेक्ट्रीशन, हॉस्पिटॅलिटी, रिटेल, वॉर्डबॉय, नर्ससेस, जेम्स ज्वेलरी, संगणक टॅली प्रशिक्षण अशा विविध अभ्यास क्रमांचा समावेश असून ही कौशल्य विकासाची प्रशिक्षणे शासनामार्फत मान्यता देण्यात आलेल्या जवळपास 70 संस्थांमधून विनामुल्य देण्यात येत आहेत. या प्रशिक्षणाचा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी लाभ घेऊन रोजगार स्वंयरोजगाराच्या संधी प्राप्त कराव्यात, असे आवाहनही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक जी.ए.सांगडे यांनी केले आहे.
    प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानांतर्गत विविध व्यवसायांचे किमान एक महिन्यापासून 6 ते 7 महिन्यापर्यंत कालावधीची प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जात असून यासाठी कौशल्य विभागामार्फत मान्यता दिलेल्या कोल्हापूर जिल्हयातील 70 संस्थामार्फत कोशल्य विकासाचे  प्रशिक्षण दिले जात आहे.  या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यास 2600 उमेदवारांना कौशल्य विकासाद्वारे रोजगार स्वंयरोजगारासाठी सक्षम करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा विभाग कार्यरत आहे.   
                                               
                                                                                                     एस.आर.माने
-         माहिती अधिकारी,कोल्हापूर
                                                                                                           

000000

शनिवार, ८ ऑक्टोबर, २०१६

हागणदारीमुक्त कोल्हापूर




   
  केंद्राच्या स्वच्छ  भारत अभियानाच्या धर्तीवर मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस  यांनी राज्यातही स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवून स्वच्छ महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यात आघाडी घेतली आहे. कोल्हापूर जिल्हयानेही याकामी सक्रीय होऊन हे अभियान गतीमान केले. उत्स्फूर्त लोकसहभागामुळे जिल्हयातील 1029 गावांपैकी 1026 गावे हागणदारीमुक्त झाली असून, 3 गावांची घोषणाही अपेक्षित आहे. 9 नगरपरिषदापैकी 8 नगरपरिषदा आणि कोल्हापूर महानगरपालिकाही हागणदारीमुक्त झाली आहे. खऱ्या अर्थाने कोल्हापूर जिल्हा संपूर्णत: हागणदारीमुक्त होत आहे. ही जिल्हा वासियांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे.   


अस्वच्छता ही आजारांची जननी असल्याने प्रत्येकाने वैयक्तिक तसेच सार्वजनिक  स्वच्छता जोपासणे अगत्याचे बनले आहे. नेमकी हीच बाब डोळयासमोर ठेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरु करुन संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ, सुंदर, समृध्द करण्यावर भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  संपूर्ण देशात गेल्या दोन वर्षापासून सुरु  केलेल्या  स्वच्छ  भारत    अभियानाला उर्त्स्फुत प्रतिसाद मिळाला. स्वच्छ भारत अभियान  हे केवळ एक अभियान राहीले नसून ती देशव्यापी लोकचळवळ बनली आहे. राज्यातही मुख्यमंत्री देवेंन्द्र  फडणवीस यांनी   स्वच्छ महाराष्ट्रासाठी दमदार पावले टाकून हे अभियान गतिमान केले आहे.
केंद्र व राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानातून जनमाणसाचं जीवन  स्वच्छ, सुंदर, समृध्द बनू लागले आहे. नागरिकांच्या सहभागातून परिसर, रस्ते, गांव व शहरे स्वच्छ व निटनेटकी होत आहेत. यामध्ये शहरी व ग्रामीण स्वच्छा अभियानाचा सहभाग असून व्यक्तीगत व सार्वजनिक शौचालये निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे. 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकांना शौचालयासह स्वच्छता, सुविधा उपलब्ध करण्याचा मुख्य उद्देश या अभियानांतर्गत ठेवण्यात आला असून त्यादृष्टीन शासनाची गतीमान वाटचालही सुरु आहे.
जिल्हयात स्वच्छ भारत अभियानाने आज गती घेतली असुन जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, महापालिका आयुक्त के. शिवशंकर यांनी जिल्हयातील मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच सर्व यंत्रणाच्या सक्रीय लोकसहभागातून हे अभियान प्रभावी केले आहे. जिल्हयातील शहरी तसेच ग्रामीण भागात हे अभियान राबविण्यात नागरिकाकडून लाभत असलेला सक्रीय योगदानही तितकेच मोलाचे आहे. स्वच्छ महाराष्ट्र  अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीव्दारे संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी  यांनी पुढाकार घेतलेला पुढाकार आणि केलेले  नियोजन कौतुकास्पद आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर व जिल्हयात लोकसहभागातून स्वच्छता मोहिम राबू लागली आहे.जिल्हा परिषदेनेही स्वच्छ महाराष्ट्र अभियान गतीमान केले असून स्वच्छतेमध्ये सातत्य ठेवण्यावरही भर दिला आहे. जिल्हा परिषदेने जिल्हयातील गावागावात स्वच्छता अभियान गतीमान करुन सर्व गावे स्वच्छ, सुंदर आणि समृध्द केली आहेत. याकामी गावकऱ्यांचा सक्रीय लोकसहभागही तितकाच महत्वाचा आहे. जिल्हयातील 1029 गांवापैकी 1026 गांवे हागणदारीमुक्त झाली असून, चंदगड तालुक्यातील केवळ 3 गावांची घोषणा लवकरच अपेक्षित आहे. या 3 गावांनी शासनाच्या  हागणदारीमुक्तीच्या धोरणानुसार 90 टक्के कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालयांची सुविधा हा निकषही पूर्ण केला असून, हागणदारीमुक्तीची घोषणा होणे बाकी आहे. 
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हयात नागरी स्वच्छता अभियानही गतीमान करुन जिल्हयातील नगरपरिषदाबरोबरच कोल्हापूर महानगरपालिकाही हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी भरीव कामगिरी करुन प्रभावी लोकसहभाग घेतला. यासाठी नगरपरिषदामध्ये स्वच्छतेची सप्तपदी हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवून शहरवासियांना स्वच्छतेची सवय लावण्यात यंत्रणा खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्या असे म्हटल्यास वावगे ठरु नये. नागरी स्वच्छता अभियानाव्दारे जिल्हयात फार मोठे काम झाले असून शहरे स्वच्छ, सुंदर आणि समृध्द होत आहेत. नागरिकांच्या प्रभावी लोकसहभागामुळे कागल नगरपरिषदेने हागणदारीमुक्तीमध्ये देशात लौकिक प्राप्त केला आहे. कागल नगरपरिषदेबरोबरच पन्हाळा, मुरगुड, मलकापूर, जयसिंगपूर, कुरुंदवाड, गडहिंग्लज,वडगांव या नगरपरिषदांनी हागणदारीमुक्त होण्याचा बहुमान पटकाविला आहे. याशिवाय कोल्हापूर महानगरपालिकेनेही हागणदारीमुक्तीत मोलाची कामगिरी बजावून हागणदारीमुक्त महानगरपालिका होण्याचा मान मिळविला आहे. ही जिल्हयाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.
संपूर्ण कोल्हापूर जिल्हा स्वच्छ, सुंदर,, समृध्द आणि आरोग्यसंपन्न करण्याच्या प्रशासनाच्या संकल्पनेस शहर आणि जिल्हयातील प्रत्येक नागरिकांनी दिलेले योगदान आणि लोकसहभागामुळेच कोल्हापूर जिल्हा हागणदारीमुक्तीच्या वाटेवर पोहोचला आहे. स्वच्छ महाराष्ट्र अ भियान हे कोणा एका व्यक्तीसाठी अथवा घटकासाठी नसून ते तुम्हा-आम्हा सर्वांसाठी आहे. आपलं शहर,, आपलं गांव आणि  परिसर स्वच्छ, सुंदर आणि नेटका ठेवून संपूर्ण जिल्हा आणि शहरांमध्ये यापुढील काळातही हागणदारीमुक्तीमध्ये सातत्य ठेवणे प्रत्येकाचेच आद्य कर्तव्य बनले आहे. चला तर मग स्वच्छ महाराष्ट्र  अभियानात सर्वानीच सामील होऊया.
 -एस.आर.माने
 -माहिती अधिकारी, कोल्हापूर

00000