सोमवार, २ ऑगस्ट, २०२१

जिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1400 क्युसेक विसर्ग

 


 

          कोल्हापूर, दि. 2 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 233.18 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे. तुळशी नदी- बीड.

वारणा नदी- चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगांव, तांदुळवाडी, चावरे, खोची, दानोळी व मांगलेसावर्डे. कासारी नदी- यवलूज, पुनाळ-तिरपन व ठाणे-आळवे. दुधगंगा नदी- दत्तवाड, बाचणी, सुळकुड व सिद्धनेर्ली असे एकूण 28 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  तुळशी -85.42 दलघमी, वारणा -841.70, दूधगंगा – 592.03, कासारी- 58.08, कडवी – 71.24, कुंभी-61.09, पाटगाव- 96.12, चिकोत्रा- 39.34, चित्री - 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला),  जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -  44.17,  जांबरे- 23.23, आंबेआहोळ - 30.98 दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

          तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 28.7 फूट, सुर्वे 30.4, रुई 63.4, इचलकरंजी 62, तेरवाड 60.8, शिरोळ 59.6 तर नृसिंहवाडी  बंधाऱ्याची 59.5 फूट इतकी पाणी पातळी  सध्या आहे.

00000

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.