कोल्हापूर, दि. 2 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 233.18 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत
विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील-
शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे. तुळशी नदी- बीड.
वारणा नदी- चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगांव,
तांदुळवाडी, चावरे, खोची, दानोळी व मांगलेसावर्डे. कासारी नदी- यवलूज, पुनाळ-तिरपन व ठाणे-आळवे. दुधगंगा नदी- दत्तवाड, बाचणी, सुळकुड व सिद्धनेर्ली असे एकूण 28
बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये तुळशी -85.42
दलघमी, वारणा -841.70, दूधगंगा – 592.03, कासारी- 58.08, कडवी – 71.24, कुंभी-61.09,
पाटगाव- 96.12, चिकोत्रा- 39.34, चित्री - 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला), जंगमहट्टी -34.65, घटप्रभा - 44.17,
जांबरे- 23.23, आंबेआहोळ - 30.98 दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
तर
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 28.7 फूट,
सुर्वे 30.4, रुई 63.4, इचलकरंजी 62, तेरवाड 60.8, शिरोळ 59.6 तर नृसिंहवाडी बंधाऱ्याची 59.5 फूट इतकी पाणी पातळी सध्या आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.