कोल्हापूर, दि. 8 (जिमाका): जिल्ह्यातील आपले सरकार सेवा
केंद्रासाठी जिल्ह्यातील एकूण 276 गावांसाठी जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आला होता.
त्यास अनुसरुन प्राप्त अर्जामध्ये अर्जांच्या छाननीअंती कागदपत्रांच्या त्रुटी
आढळून आल्या आहेत. संबंधित अर्जदारांना त्रुटींची पुर्तता करण्यासाठी दि. 17
फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुदत देण्यात येत असल्याची माहिती
निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली आहे.
आपले सरकार सेवा केंद्रासाठी यापूर्वी ज्यांनी अर्ज दाखल केले
आहेत त्यांच्या नावांची व अपूर्ण कागदपत्रे असणाऱ्या अर्जदारांची यादी
जिल्ह्याच्या kolhapur.gov.in या संकेतस्थळावर दि. 7 फेब्रुवारी
रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. संबंधित अर्जदार यांनी संकेतस्थळावर भेट देवून
आपल्या अर्जामध्ये असणाऱ्या त्रुटी तपासाव्यात आणि त्रुटींची पुर्तता करावी.
कागदपत्रांची पुर्तता न करणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही श्री. कांबळे
यांनी कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.