कोल्हापूर. दि. 28: कोल्हापूर जिल्ह्याच्या
ग्रामीण भागातील काविळीची साथ आटोक्यात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व औषध
खरेदीसाठी सहकार, संसदीय कार्य तथा पालकमंत्री
हर्षवर्धन पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून 21 लाख रुपयांचा निधी खास बाब म्हणून उपलब्ध करुन देण्याचा
निर्णय घेतला आहे.
काविळीची साथ आटोक्यात आणण्यासाठी मंत्रालय, मुंबई येथे बैठक झाली. पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जिल्हा
नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेतून खास बाब म्हणून निधी उपलब्ध करण्याच्या
सूचना दिल्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज यांनी सदरच्या
प्रस्तावास तातडीने प्रशासकीय मान्यता दिली. तसेच हा निधी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या नांवे प्राधिकारपत्राव्दारे वितरीत
केलेला आहे असे जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे यांनी सांगितले.
या निधीतून काविळीची लागण
झालेल्या रुग्णांना तातडीचे आषध उपचार करता यावेत यासाठी हा निधी औषधे खरेदी
करण्यासाठी वापरावा, अशा सूचना जिल्हाधिकारी धुळाज
यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांना
पत्राव्दारे दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.