** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, June 29, 2012

शेतीच्या शाश्वत विकासासाठी ऊस पाचट अभियान उपयुक्त राज्यमंत्री सतेज पाटील यांचे प्रतिपादन

कोल्हापूर , दि. २९ - ऊस पाचट अभियान शेतीच्या शाश्वत विकासासाठी अतिशय उपयुक्त आहे. शेतीच्या क्षेत्रात या अभियानासारखे नाविन्यपुर्ण प्रयोग राबवायला हवेत, असे प्रतिपादन गृह, ग्राम विकास, राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे केले.
जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ऊस पाचट अभियानात सहभागी झालेल्या आणि विमान प्रवासाची संधी लाभलेल्या शेतकरी दांपत्यांचा आज सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. येथील दसरा चौकात हा कार्यक्रम झाला.
जिल्हा कृषी कार्यालयाच्या वतीने ऊस पाचट अभियान राबविण्यात आले. त्यात जिल्ह्यातील सुमारे ६० टक्के ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी सहभाग घेतला. या अभियानात सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांतून लकी ड्रॉच्या सहाय्याने प्रत्येक तालुक्यातील दोन याप्रमाणे चोवीस दांपत्यांना पुणे-बंगळूर विमान प्रवास करण्याची संधी मिळाली आहे. आज सकाळी हे शेतकरी आणि कृषी विभागाचे अधिकारी पुण्याला रवाना झाले. त्यावेळी त्यांच्या बसला मंत्री पाटील यांच्या हस्ते ध्वज दाखविण्यात आला.
श्री. पाटील यांनी सांगितले की, धकृषीच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग होण्याची आवश्यकता आहे. ऊस पाचट अभियान हा असाच एक महत्वाचा प्रयोग आहे.  शेत मालाचा उत्पादन खर्चात कपात करणार्‍या, पाणी, वीज आणि खताची  बचत करणार्‍या या अभियानामुळे शेती किफायतशीर होण्यास मदत  होणार आहे. या अभियानात आधिक आधिक शेतकर्‍यांनी सहभागी व्हायला हवधे.
यावेळी श्री. पाटील यांच्या हस्ते शेतकर्‍यांचा फेटा आणि गुलाब फुल देउन  सत्कार करण्यात आला. विमान प्रवास करण्याची संधी मिळणार या बाबीने सर्वच शेतकर्‍यांत उत्साह होता. श्री. पाटील यांनीही शेतकर्‍यांशी संवाद साधला. त्यामुळे शेतकर्‍यांचा उत्साह आधिकच दुणावला.
विजेते ठरलेले शेतकरी आज पुण्याकडे रवाना झाले. तेथून ते विमानाने बंगळूरला रवाना होतील. बंगऴूरला एक दिवसाच्या मुक्कामानंतर हे शेतकरी रविवारी कोल्हापूरला परत येतील, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील यांनी सांगितले. पाचट अभियान यशस्वी करण्यासाठी उपसंचालक सुधर्म जामसांडेकर, व्ही.बी. जाधव, एस.पी. बेंदगुडे, आर.एस. रानगे, अतुल जाधव, प्रकाश देसाई, एकनाथ माने, के.एम.बागवान,विजय धुमाळ, एम.व्ही.  लाटकर आदींनी संयोजन केले.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.