कोल्हापूर,
दि. 22 : अरबी समुद्रातील शिवस्मारक भुमीपुजन सोहळ्यासाठी पन्हाळगडावरील पवित्र
मातीचा कलश आज आमदार सत्यजित पाटील व आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रमुख
उपस्थितीत पन्हाळ्यावरुन समारंभपुर्वक कोल्हापूरकडे रवाना करण्यात आला. मुंबईजवळच्या
अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या
स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार
दिनांक 24 डिसेंबर रोजी होत आहे. या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी या
आतरराष्ट्रीय स्मारकासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व गड आणि किल्ले,
हुतात्म्यांच्या स्मारकांच्या ठिकाणची पवित्र माती आणि नद्यांचे पाणी मुंबईला उद्या
समारंभपूर्वक पाठविण्यात येणार आहे. यासाठी पन्हाळागडावरील माती आकर्षक कलशातून
कोल्हापूरकडे आज रवाना करण्यात आली.
पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात कलशाचे
पुजन करण्यात येऊन त्यामध्ये गडावरील पवित्र मातीचे पुजन करुन कलश कोल्हापूरकडे
रवाना करण्यात आले. अरबी समुद्रात उभारण्यात
येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन व
भूमिपूजन सोहळ्यासाठी जिल्ह्यातील जनतेने विशेषत: पन्हाळापरिसरातील जनतेने तसेच शिवप्रेमींनी
मोठ्यासंख्येने उपस्थित राहुन या अंतरराष्ट्रीय सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा
बहुमान मिळावावा असे आवाहन आमदार सत्यजित पाटील व आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.
यावेळी याप्रसंगी नुकत्याच निवडून आलेल्या नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनीही या
सोहळ्यासाठी आपल्या शुभेच्छा दिल्या.
0000000


No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.