कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : सामाजिक
न्याय विभागाच्या स्थापनेमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान
मोलाचे असल्याचे प्रतिपादन सायबर महाविद्यालयाचे प्रा.डॉ. दीपक भोसले यांनी केले. राज्याच्या
सामाजिक न्याय विभागाची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून 15
ऑक्टोबर 1932 रोजी मुंबई येथे झाली. या घटनेला 15 ऑक्टोबर 2022 रोजी 90 वर्ष पूर्ण
होत आहेत. त्या दिनाचे औचित्य साधून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर व
जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास शाहू कॉलेजचे प्राचार्य एल.डी.
कदम, हुपरी नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक श्रीमती तातोबा हांडे (तृतीयपंथी), जिल्हा
जात पडताळणी प्रमाणपत्र समितीचे संशोधन अधिकारी सचिन साळे व समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे उपस्थित
होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीरंग
पाटील यांनी केले. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या विविध
कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्र वितरीत करण्यात आले.
तसेच लाभार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. श्री. साळे व श्री. लोंढे यांनी मार्गदर्शन
केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक सचिन परब यांनी तर आभार प्रदर्शन
समाज कल्याण विभागाचे निरीक्षक डी. एस. पाटील यांनी केले.
00000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.