कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : जिल्हा
परिषदेचे मेन राजाराम हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथील विद्यार्थिनींनी नाशिक येथे पार पडलेल्या १९ वर्षाखालील
राज्यस्तरीय खो- खो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवत कोल्हापूरच्या क्रीडा नगरीचा
नावलौकिक वाढविला. या विद्यार्थिनींच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी पालकमंत्री
प्रकाश आबिटकर यांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून आवर्जून वेळ काढत त्यांच्या पाठीवर
कौतुकाची थाप टाकली आणि यापुढे मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, याची ग्वाही दिली.
निमित्त होते....नाशिक येथे राज्यस्तरीय
पार पडलेल्या खो-खो क्रीडा स्पर्धेत मुलींनी प्रथम क्रमांक मिळविला.यातील सानिका चाफे,
श्रावणी पाटील व अमृता पाटील या तीन खेळाडूंची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली.27
डिसेंबर रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत या संघाने
द्वितीय क्रमांक मिळवला.
या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात
पार पडलेल्या या छोटेखानी समारंभात पालकमंत्री श्री आबिटकर यांच्या हस्ते या संघातील
१२ खेळाडूंनाना नामवंत कंपनीचे स्पोर्ट शूज भेट दिले . तर या मुलींच्या संघातील खेळाडूंना
प्रत्येकी दोन ट्रॅक सूट किट हे भेट स्वरूपात देणार असल्याची घोषणा आ.अमल महाडिक यांनी
केली.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा
परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकीयेन , क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, माध्यमिक
शिक्षणाधिकारी मीना शेंडकर,क्रीडा अधिकारी विद्या शिरस, मेन राजाराम हायस्कूल व ज्यु.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गजानन खाडे आदी
उपस्थित होते.
चौकट :- ग्रामीण भागात फाटके बूट घालून
खो - खो चा सराव करणाऱ्या या विद्यार्थ्यांची ही परिस्थिती पाहून जिल्हा प्रशासनाने
CSR निधीतून या बारा विद्यार्थ्यांना नामवंत कंपनीचे स्पोर्ट शूज भेट देऊन त्यांच्यातील
खेळाप्रति असलेल्या समर्पणाचा गौरव केला.
0000


No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.