कोल्हापूर दि. 30 (जि.मा.का.) : छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन प्रतिकूल
परिस्थितीमध्ये मुघल साम्राज्याला आव्हान देत मराठा साम्राज्याची निर्मिती केली.
या पदभ्रमण मोहिमेमधून इतिहासाच्या अभ्यासाबरोबरच शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा
विकास होतो. याचा अनुभव घ्या, यातून शिका आणि आनंदही घ्या, असे आवाहन जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले.
छत्रपती
शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय जोशपूर्ण आवाजात घोषणा देत राष्ट्रीय छात्र
सैनिकांची तीसरी तुकडी आज शिवाजी पदभ्रमण मोहिमेसाठी रवाना झाली. महापौर सुरमंजिरी
लाटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आझाद हिंद ट्रस्टचे डॉ. सुरेद्र जैन,
सेवा सदन रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. उमेश कदम, उद्योजक रणजित शहा, रजनीकांत पाटील,
निवृत्त मेजर संजय शिंदे, मुंबईचे ग्रुप कंमाडर ब्रिगेडीयर जी. एस. चिमा, ग्रुप कमांडर ब्रिगेडीयर आर. बी. डोग्रा यांनी
या तुकडीला ध्वज दाखविला.
सुरुवातीला छत्रपती शिवाजी
महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कर्नल आर.
बी. होला यांनी शिवाजी पदभ्रमण मोहिमेचे उद्दिष्ट सांगून पदभ्रमण मार्गाची माहिती
आणि इतिहास सांगितला. ते म्हणाले, सुमारे 360 वर्षापूर्वी नोव्हेंबर 1669 मध्ये
पन्हाळागड स्वराज्यामध्ये
महाराजांनी
दाखल केला.
श्री. मित्तल पुढे म्हणाले, छत्रपती
शिवाजी महाराजांचा हा ऐतिहासिक मार्ग इतिहासात प्रसिध्द आहे. या मार्गावरुन तुम्ही
पदभ्रमण करत असताना महाराजांचा तो ऐतिहसिक क्षण अनुभवा. अशा पदभ्रमण मोहिमेमधून
शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढते. आयुष्यामध्ये स्वत: ला सिध्द करण्यासाठी अशा
मोहिमांचा निश्चित फायदा होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राचाही जरुर
अभ्यास करा, असेही ते शेवटी म्हणाले.
एन. सी. सी. गीतानंतर उपस्थित मान्यवरांनी ध्वज
दाखवून तुकडीला रवाना केले. छत्रपतींच्या आणि भारत मातेच्या जयघोषात ही तुकडी
मार्गस्थ झाली. आजच्या या तुकडीत राज्यातील कोल्हापूर, पुणे तसेच देशातील
आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील छात्रांचा सहभाग आहे. यावेळी
कर्नल राजेशकुमार, कर्नल राजेश शहा, कर्नल के.के. मोरे, कर्नल एम.के. तिवारी,
लेप्टनंट कर्नल सुनील नायर आदी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.