** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, July 5, 2022

सायंकाळी 4 वाजेपर्यंत 20 बंधारे पाण्याखाली

 

4 P.M.


          कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 78.80 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून जिल्ह्यातील एकूण 20 बंधारे पाण्याखाली आहेत.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी व सरकारी कोगे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कुंभेवाडी, कांटे, करंजफेण, पेंडाखळे व बाजारभोगाव, कुंभी नदीवरील- मांडूकली व शेणवडे असे 20 बंधारे पाण्याखाली आहेत.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.