** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, February 28, 2020

पाच दिवसांचा आठवडा : सुट्टीच्या मोबदल्यात कामाची हमी वचनाचे पावित्र्य जपण्याठी अधिकारी -कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ



        कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी शासनाने मान्य केली, सुट्टीच्या मोबदल्यात अधिकारी-कर्मचारी संघटनाने कामाची हमी दिली असून जनतेला दिलेल्या वचनाचे पावित्र्य जपण्यासाठी आज सर्व अधिकारी -कर्मचाऱ्यांनी कर्तव्य भावनेतून वचनबध्दतेची शपथ दिली.
        महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिवाजी सभागृहात या शपथ कार्यक्रमास  महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हाधिकारी संजय शिंदे,  जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, जनगणना संचालनालयाचे उपसंचालक सतीश पायस, जिल्हा सांख्यिकी अधिकारी भूषण देशपांडे, अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यासह अधिकारी- कर्मचारी  उपस्थित होते.
          अधिकारी - कर्मचाऱ्यांनी दिलेली शपथ अशी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पुरोगामी भूमितील नागरिक असण्याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. या थोर पुरुषांच्या महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे अथक प्रयत्नशील असतो. यापुढेही कार्यालयीन कामाच्या वेळेत जनतेची कामे अधिक वेगाने व सकारात्मक दृष्टीने सदैव करीत राहू. आमच्या रजा अथवा सुट्ट्या यामुळे जनतेच्या कामांत कोणतीही अडचण येणार नाही. आमची सर्व ऊर्जा, सर्जनशीलता आणि उत्साह याद्वारे 21 व्या शतकातील वैभवशाली नवमहाराष्ट्राच्या उभारणीसाठी आम्ही वचनबध्द होत आहोत. वचनाचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी जनतेचे सेवक या नात्याने आमच्या कार्यसंस्कृतीद्वारे आम्ही स्वीकारत असून त्याची हमी महाराष्ट्राच्या जनतेला देत आहोत.
00000
         



No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.