कोल्हापूर, दि. 27 (जि.मा.का) - तालुक्याच्या
ठिकाणी आपले सरकार केंद्र स्थापन करण्यासाठी मागणी करण्यात आलेल्या अर्ज
प्रक्रियेस पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी
भाऊ गलांडे यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र
राज्यात सध्या कार्यरत असलेल्या सर्व महा ई सेवा केंद्र, सेतू, सुविधा केंद्र,
नागरी सुविधा केंद्र तसेच संग्राम केंद्र याना आपले सरकार सेवा केंद्र हे नाव देऊन
सर्व कॉमन सर्व्हीस सेंटरचे एकसारखे ब्रँडिंग करण्यात आले आहे. सध्या प्रत्येक
तालुक्याचे तहसिल कार्यालयात (करवीर व गगनबावडा वगळून) सेतू सुविधा केंद्र कार्यरत
आहे.
सेतू
सुविधा केंद्राची मुदत संपली असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी (करवीर
वगळून) आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी दि. 31 मार्च
2020 अखेर अर्ज मागणी करण्यात आले होती. सध्या कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे अर्ज
स्वीकारण्याच्या प्रक्रीयेस पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आल्याचे निवासी
उपजिल्हाधिकारी श्री. गलांडे यांनी कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.