कोल्हापूर,
दि. 2 (जि.मा.का) :- जिल्ह्यातील 11
निवारागृहांमध्ये राज्यातील 114 आणि परराज्यातील 487 अशा एकूण 601 जणांना
संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यात सर्वात जास्त तामिळनाडूमधील 190 जणांचा
तर सर्वात कमी पश्चिम बंगालमधील एकाचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत
देसाई यांनी दिली.
कोल्हापूर
महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार पेठ येथे राज्यातील 17
परराज्यातील 5 अशा 22 जणांचा समावेश असून
याची क्षमता 50 जणांची आहे. रामकृष्ण हॉल, लोणार वसाहत राज्यातील 17 परराज्यातील 8
अशा 25 जणांचा समावेश असून याची क्षमता 50 जणांची आहे. करवीर तालुका- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी येथे राज्यातील 2 परराज्यातील 35 एकूण 37 जण
असून क्षमता 70 जणांची आहे. कागल- डॉ.
बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह कागल येथे राज्यातील 3 परराज्यातील 97 एकूण 100 जण
असून क्षमता 117 जणांची आहे. जयसिंगराव घाटगे विद्यालय येथे राज्यातील 4
परराज्यातील 39 असे एकूण 43 जण असून क्षमता 50 जणांची आहे.
हातकणंगले-घुगरे सर यांचे निवासी गुरुकुल वडगाव येथे राज्यातील 1
परराज्यातील 75 असे एकूण 76 जण असून क्षमता 100 जणांची आहे. अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव राज्यातील 2 परराज्यातील 113
असे एकूण 115 जण असून क्षमता 115 जणांची आहे. शहरी बेघर निवारा केंद्र इचलकरंजी
येथे राज्यातील 50 एकूण 50 जण असून क्षमता 50 जणांची आहे. शिरोळ- शाळा क्रमांक 1 जयसिंगपूर येथे परराज्यातील 18 एकूण 18 असून
क्षमता 25 जणांची आहे. गगनबावडा- माधव
विद्यालय गगनबावडा येथे राज्यतील 13 एकूण 13 असून क्षमता 20 जणांची आहे. समाज
कल्याण निवासी शाळा वसतीगृह गगनबावडा येथे राज्यातील 5 परराज्यातील 97 असे एकूण
102 असून क्षमता 105 जणांची आहे.
यामध्ये
कर्नाटकातील 188, तामिळनाडूमधील 190, राजस्थानमधील 58, उत्तरप्रदेश मधील 28, मध्यप्रदेशमधील
14, पाँडेचरी मधील 3, पश्चिम बंगालमधील 1, केरळमधील 5 अशा एकूण 8 राज्यातील 487
जणांचा तसेच महाराष्ट्रातील 114 असे मिळून 601 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण
करण्यात आले आहे.
0 0 0 0 0 0

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.