** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, September 11, 2019

शिरोळमधील 4 गावातून 119 तर करवीर मधील दोन गावातून 259 कुटुंबांचे स्थलांतर/करवीरमधील दोन मार्ग सुरु अद्यापही 7 राज्यमार्ग आणि 13 प्रमुख जिल्हा मार्ग बंद


शिरोळमधील 4 गावातून 119 तर करवीर मधील दोन गावातून 259 कुटुंबांचे स्थलांतर
            कोल्हापूर, दि. 10 (जि.मा.का.) : खबरदारीचा उपाय म्हणून आज अखेर शिरोळमधील चार गावातील 119 कुटुंबातील 501 व्यक्तींचे तर करवीर तालुक्यातील प्रयाग चिखलीमधील 250 कुटुंबातील 390 आणि कोल्हापूर शहरातील 9 कुटुंबातील 28 जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
            शिरोळ तालुक्यातील गोठणपूर (कुरुंदवाड) मधील 26, राजापूरमधील 48, राजापूरवाडीमधील 18 व खिद्रापूरमधील 27 अशा 4 गावातून 119 कुटुंबातील 502 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये 162 पुरुष, 190 स्त्रीया आणि 150 लहान मुलांचा समावेश आहे. त्याचबरोबरच 135 जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे. 
            करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली गावातील 250 कुटुंबातील 390 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये 90 पुरुष, 300 स्त्रीया यांचा समावेश आहे. त्याचबरोबर गावातील 450 जनावरांचेही स्थलांतर झाले आहे. कोल्हापूर शहरातील 9 कुटुंबातील 28 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये 15 पुरुष, 13 स्त्रीया यांचा समावेश आहे. अशा एकूण 378 कुटुंबातील 920 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. 
000
करवीरमधील दोन मार्ग सुरु
अद्यापही 7 राज्यमार्ग आणि 13 प्रमुख जिल्हा मार्ग बंद
         कोल्हापूर, दि. 10 (जि. मा. का.) : करवीर तालुक्यातील कोल्हापूर परिते, गारगोटी गडहिंग्लज, कोदाळी भेडशी ते राज्‍य हद्द हा राज्य मार्ग क्र. 189 आणि शिरोली, दुमाला, बाचणी हा प्रमुख जिल्हा मार्ग क्र. 37 आज सुरु झाली आहे. अद्यापही 7 राज्यमार्ग व 13 प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी दिली.
000
      

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.