** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, September 6, 2019

पंचगंगा नदी पाणी पातळी कमी होण्याची शक्यता -रोहित बांदिवडेकर



कोल्हापूर, दि. 6 (जि. मा. का.) : धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने राधानगरी धरणाच्या 4 स्वयंचलित दरवाजे आणि वीजगृहातून 7 हजार 112 क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये,असे आवाहन पाटबंधारे उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केले आहे.
       जिल्ह्यातील धरण क्षेत्रात गेल्या 3 दिवसात पाऊस झाल्याने पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील  पाणी पातळीत गेल्या 3 दिवसात 13 फूटांनी वाढ होऊन आज ती 33 फूट इतकी आहे. सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. तुळशीतून 1 हजार 11, कुंभीतून 1 हजार 850, कासारीमधून 1 हजार 250 असा  पंचगंगा नदीतून 11 हजार 223 एवढा विसर्ग सुरू आहे. त्याचबरोबर राजाराम बंधाऱ्यातून 33 हजार 332 क्युसेक एवढा विसर्ग चालू आहे. म्हणजेच मुक्त पाणलोट क्षेत्रातून 22 हजार 109 क्युसेक एवढा विसर्ग सुरू आहे.
          पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमी होण्याची शक्यता असल्याने कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवणार नाही. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. नदी काठावरील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन श्री. बांदिवडेकर यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.