कोल्हापूर, दि. ८ (जि.मा.का.) :खबरदारीचा उपाय म्हणून
शिरोळमधील चार गावातील ९७ कुटुंबातील ३७५ व्यक्तींचे तर करवीर तालुक्यातील प्रयाग
चिखलीमधील २५० कुटुंबातील ३९० जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
शिरोळ तालुक्यातील गोठणपूर (कुरुंदवाड) मधील ४, राजापूरमधील
४८, राजापूरवाडीमधील १८ व खिद्रापूरमधील २७ अशा ४ गावातून ९७ कुटुंबातील ३७५
व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये ११७ पुरुष, १४९
स्त्रीया आणि १०९ लहान मुलांचा समावेश आहे. त्याचबरोबरच ११६ जनावरांचेही स्थलांतर
करण्यात आले आहे.
करवीर
तालुक्यातील प्रयाग चिखली गावातील २५० कुटुंबातील ३९० व्यक्तींचे सुरक्षित स्थळी
स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये ९० पुरुष, ३०० स्त्रीया यांचा समावेश आहे.
त्याचबरोबर गावातील ४५० जनावरांचेही स्थलांतर झाले आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.