कोल्हापूर, दि. 27 (जिमाका): केंद्र
शासनाच्या नारी शक्ती पुरस्कारासाठी महिला कल्याणाच्या क्षेत्रात विशेष कार्य
करणाऱ्या महिला, महिला गट, शैक्षणिक, सामाजिक संस्था यांच्याकडून प्रस्ताव
मागविण्यात येत आहेत. यासाठी अर्जदाराने आपले अर्ज/ नामनिर्देशन योग्य त्या
कागदपत्रासह www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरावयाचे आहे. प्रस्ताव दि. 31 जानेवारीपर्यंत
सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी केले
आहे.
नामनिर्देशनासाठी पात्रता-
सर्व व्यक्ति आणि संस्थांसाठी पुरस्कार खुला आहे. वैयक्तिक
श्रेणीच्या बाबतीत नामांकन मिळाल्याच्या तारखेच्या शेवटच्या तारखेस किमान वय 25
वर्षे असणे आवश्यक आहे. अर्जदार संस्थेने संबंधित क्षेत्रात किमान 5 वर्षे काम
केलेले असावे. यापूर्वी नारी शक्ती पुरस्कार व स्त्री शक्ती पुरस्कार प्राप्त
व्यक्ति अथवा संस्था अर्ज करु शकणार नाहीत. व्यक्ति, संस्था, अशासकीय संस्था यांनी
महिलांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीकरिता तसेच महिलांसाठीच्या पारंपारिक व आधुनिक
क्षेत्रामध्ये काम केलेले असावे. तसेच महिलांचे आरोग्य, शिक्षण, संरक्षण व काळजी व
उन्नती, आदर व महिलांच्या सन्मानाकरिता काम केलेले असावे.
दोन लाख रुपये रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या
पुरस्काराचे स्वरुप आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.