कोल्हापूर, दि. 28 (जिमाका): जिल्हा विधी सेवा
प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमुख व्ही. व्हि.जोशी
यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांच्या
सूचनेनुसार ज्येष्ठ कवी. वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मशताब्दी
निमित्त मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आज विधी सेवा प्राधिकरण येथे आयोजन
करण्यात आले होते.
विधी सेवा प्राधिकरणाचे सहा.अधिक्षक राजीव माने यांनी सुत्रसंचलन केले.
विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे म्हणाले, सर्व भाषांचे
ज्ञान असणे काळानुसार गरजेचे आहे, परंतु मराठी भाषेला दोष देऊन इतर भाषेचा सन्मान करणे चुकीचे आहे. मराठी भाषेचा वापर
कायम केला तर ती भाषा जिवंत व समृध्द होईल व इतर भाषेप्रमाणे मराठी भाषेलाही महत्व
दिले पाहिजे. घरामध्ये मुलांच्या समोर तसेच इतर ठिकाणी सुद्धा मराठी भाषेचा
जास्तीत-जास्त वापर केला पाहिजे. मराठी भाषेविषयी जनजागृती केली पाहिजे. तसेच
पत्रव्यवहार, संवाद, मराठी परिपत्रके नियमित वाचन करणे, मराठी साहित्याची ओळख
मुलांना लहानपणापासूनच करून देणे अतिशय गरजेचे आहे तर आणि तरच मराठी भाषेची उन्नती
होईल, अशा शब्दांत त्यांनी यावेळी मार्गदर्शन
केले.
यावेळी जिल्हा न्यायालयातील अधिकारी कर्मचारी व विधी सेवा
प्राधिकरणातील विधी स्वयंसेवक उपस्थित
होते. कार्यक्रमाचे आभार सहा. अधिक्षक श्री.
माने यांनी मानले.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.