कोल्हापूर,
दि.25 (जिमाका) : मनरेगा आयुक्त, नागपूर यांच्याकडून जिल्हयासाठी 3 लाख 42 हजार 620 इतके मनुष्यदिवसाचे लक्षांक प्राप्त झाले
होते. जिल्हयास प्राप्त मनुष्यदिवसांच्या लक्षांकाची 100 टक्के पूर्तता केली
असल्याचे उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रशांत खेडेकर यांनी कळविले आहे.
पालकमंत्री
सतेज पाटील यांनी मनरेगा अंतर्गत सन 2021-22 मध्ये दिलेल्या मनुष्यदिवसांच्या
लक्षांकाची पूर्तता केल्याबद्दल जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि
उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांचे कौतुक केले तसेच पुढील कामास शुभेच्छा दिल्या.
सन
2021-22 मध्ये दिलेल्या मनुष्यदिवसाचे लक्षांकपूर्तीसाठी विविध यंत्रणांकडून
घरकूल, नाडेप कंपोष्ट व्हर्मी कंपोष्ट, फळबाग लागवड, वैयक्तिक शौचालय, शौषखड्डा,
पाणंद रस्ता, सिंचन विहीर, जनावरांचा गोठा, रेशीम किटक संगोपन, वृक्षलागवड, शाळा संरक्षक
भिंत, सार्वजनिक शौचालय इत्यादी प्रकारची कामे हाती घेण्यात आली.
जिल्हाधिकारी
राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी, संजयसिंह चव्हाण यांनी वेळोवेळी सर्व
यंत्रणांचा आढावा घेवून लक्षाकपूर्तीसाठी मार्गदर्शन केले. पुणे विभागाच्या उपायुक्त (रोहयो), नयना बोंदार्डे, उपमुख्य कार्यकारी
अधिकारी अरूण जाधव, आणि बीडाओ (नरेगा) शुभदा पाटील यांनी सर्व यंत्रणांशी समन्वय
साधून लक्षांकपूर्तीसाठी प्रोत्साहीत केले.
गटविकास अधिकारी- आजरा, भूदरगड, चंदगड,
गडहिंग्लज, हातकणंगले, कागल, राधानगरी व शिरोळ, तालुका कृषी अधिकारी गगनबावडा,
पन्हाळा व राधानगरी, वनक्षेत्रपाल (सा.वनिकरण) चंदगड आणि जिल्हा रेशिम अधिकारी
कोल्हापूर यांनी सन 2021-22 मध्ये दिलेल्या लक्षांकापेक्षा जास्त लक्षांकपूर्ती
केलेली आहे.
0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.