कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती
कार्यालय) : राधानगरी धरणात 234.16 दलघमी
पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरीतून 1400,
कोयनेतून 34211 तर अलमट्टी धरणातून 111279 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील राजाराम,
सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती
नदीवरील खडक कोगे असे सात बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 104.61
टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 121.957 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये पुढीलप्रमाणे
पाणीसाठा आहे. तुळशी 98.29 दलघमी, वारणा 974.19 दलघमी, दूधगंगा 719.12 दलघमी,
कासारी 78.56 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 76.86 दलघमी, पाटगाव 105.24 दलघमी,
चिकोत्रा 43.12 दलघमी, चित्री 53.41 दलघमी, जंगमहट्टी 34.65 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे
(ल. पा.) 6.06 दलघमी असा आहे.
तसेच
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 17, सुर्वे 18.10 फूट, रुई 46
फूट, इचलकरंजी 44 फूट, तेरवाड 40.6 फूट, शिरोळ 35 फूट, नृसिंहवाडी 36.6 फूट,
राजापूर 24.6 फूट तर नजीकच्या सांगली 24 फूट व अंकली 24 फूट अशी आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.