** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, July 30, 2019

राधानगरीत 95 टक्के पाणीसाठा नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे



कोल्हापूर, दि. 30 (जि.मा.का.) : राधानगरी धरण आज दुपारी 4 वाजता 95 टक्के भरले आहे. कोणत्याही क्षणी विसर्ग होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावातील लोकांनी सतर्क रहावे, असा दक्षतेचा इशारा पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी यांनी दिला आहे.
       पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या काही तासात राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरून धरणाचे स्वंयचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठी व सखल भागात राहणाऱ्या लोकांनी सतर्क रहावे, असा दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
0000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.