** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, July 20, 2019

सरकारी जमीन मागणीसाठी अर्ज करावेत



कोल्हापूर,दि.20 (जि.मा.का.) :सैन्य तथा सशस्त्र दलातील वीरमरण आलेल्या महाराष्ट्र राज्याचे अधिवाशी असणाऱ्या शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व कायदेशीर वारस यांना दोन हेक्टर शेतीयोग्य सरकारी जमिनी वाटप  करण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासने यांनी कळविले आहे. .
       वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व  कायदेशीर वारस (ज्यांनी अद्याप सरकारी जमीन मागणीसाठी अर्ज सादर केले नाहीत) त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावेत. अर्जासोबत आधार कार्ड, स्वत:चा मोबाईल नंबर, डिसचार्ज पुस्तक, ओळख पत्र, पी. पी. ओ. ची छायांकित प्रत घेऊन यावे.
          अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कार्यालय, कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक 0321-2665812 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
00000
           



No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.