कोल्हापूर, दि. 24 (जि.मा.का.) : अलमट्टी धरणातून 17491
क्युसेक विसर्ग तर राधानगरी विद्युत
विमोचकातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, अशी माहिती पंचगंगा
पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी आज
दिली.
पंचगंगा नदीची
राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी
7 वाजता 14.5 फूट असून, 1 बंधारा
पाण्याखाली आहे. राधानगरी धरणात आज अखेर 7.91 टीएमसी पाणीसाठा आहे. तुळशी मोठा
प्रकल्प, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव, कासारी व जांबरे मध्यम
प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
पंचगंगा
नदीवरील- इचलकरंजी हा 1 बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या अलमट्टी धरणात 123.081 टीएमसी पाणी साठा आहे, तर कोयना धरणात 101.47 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे
पाणीसाठा आहे. तुळशी 3.47 टीएमसी, वारणा 32.59 टीएमसी, दूधगंगा 24.56 टीएमसी,
कासारी 2.77 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.56 टीएमसी, पाटगाव 3. 66 टीएमसी,
चिकोत्रा 1.50, चित्री 1. 86 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी,
जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.
बंधाऱ्यांची
पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 14.5 फूट, सुर्वे 16.7 फूट, रुई 41.6 फूट,
इचलकरंजी 38 फूट, तेरवाड 36.9 फूट, शिरोळ 29 फूट, नृसिंहवाडी 25.6 फूट, राजापूर 16.6
फूट तर नजीकच्या सांगली 8.3 फूट आणि अंकली
6.3 फूट अशी आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.