** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, August 10, 2019

पंचगंगेच्या पातळीत साडेतीन फुटांनी घट 249 गावांमधून 48 हजार 588 कुटुंबातील 2 लाख 33 हजार 150 जणांचे स्थलांतर -जिल्हाधिकारी दौलत देसाई


पंचगंगेच्या पातळीत साडेतीन फुटांनी घट
249 गावांमधून 48 हजार 588 कुटुंबातील
                       2 लाख 33 हजार 150 जणांचे स्थलांतर                        
                 -जिल्हाधिकारी दौलत देसाई

            कोल्हापूर दि. 10 (जिमाका)  : पंचगंगेच्या पातळीत साडेतीन फुटांनी घट झाली आहे. पाणी ओसरतय ही दिलासा देणारी बाब आहे. आजअखेर एकूण 249 गावांमधून 48 हजार 588 कुटुंबातील 2 लाख 33 हजार 150 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. यात शिरोळ तालुक्यातील 42 गावामधून 30 हजार 565 कुटुंबातील 1 लाख 52 हजार 825 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
            तालुकानिहाय कुटुंब आणि सदस्य संख्या पुढीलप्रमाणे - कागल - 35 गावातील 1 हजार 848 कुटुंबातील 8 हजार 53 सदस्य, राधानगरी – 17 गावातील 558 कुटुंबातील 3 हजार 40 सदस्य, गडहिंग्लज – 15 गावातील 936 कुटुंबातील 4 हजार 3 सदस्य, आजरा– 22 गावातील 87 कुटुंबातील 333 सदस्य, भुदरगड – 14 गावातील 257 कुटुंबातील 1 हजार 31 सदस्य, शाहुवाडी – 6 गावातील 123 कुटुंबातील 489 सदस्य, पन्हाळा – 28 गावातील 405 कुटुंबातील 1 हजार 833 सदस्य, शिरोळ – 42 गावातील 30 हजार 565 कुटुंबातील 1 लाख 52 हजार 825 सदस्य, हातकणंगले – 21 गावातील 5 हजार 993 कुटुंबातील 26 हजार 758 सदस्य, करवीर – 35 गावातील 5 हजार 101 कुटुंबातील 23 हजार 680 सदस्य, गगनबावडा– 2 गावातील 50 कुटुंबातील 241 सदस्य, चंदगड – 11 गावातील 96 कुटुंबातील 516 सदस्य तर महापालिकेच्या माध्यमातून 2 हजार 569 कुटुंबातील 10 हजार 348 जणांचे स्थलांतर करण्यात आले.
                                    ००००००

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.