** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, August 9, 2020

67 बंधारे पाण्याखाली


            कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 233.883 दलघमी पाणीसाठा आहे. आज सायंकाळी 4 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील-  शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, शिरगांव, सरकारी कोगे, खडक कोगे व तारळे. तुळशी नदीवरील बीड व आरे. कासारी नदीवरील- कुंभेवाडी, कांटे, करंजफेण, पेंडाखळे, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ तिरपन, ठाणे आळवे व यवलूज.  कुंभी नदीवरील- शेनवडे, वेतवडे, सांगरूळ व कळे. धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, पनोरे. वारणा नदीवरील-चिंचोली, माणगांव, कोडोली, खोची, तांदूळवाडी, मांगलेसावर्डे, शिगांव, चावरे व दानोळी. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगांव, सरूडपाटणे, बालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, बाचणी, सुळकूड, दत्तवाड, कसबा वाळवे व तुरंबे. वेदगंगा नदीवरील- कुरणी, सुरूपली, बस्तवडे, चिखली,निळपण व वाघापूर. हिरण्यकेशी नदीवरील-खणदाळ व निलजी. घटप्रभा नदीवरील- कानडे सावर्डे, आडकूर व तारेवाडी. ताम्रपर्णी नदीवरील-कुर्तनवाडी, चंदगड, कोवाड. असे एकूण 67 बंधारे पाण्याखाली आहेत.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 42.8 फूट, तेरवाड 58.6 फूट, शिरोळ 54.9 फूट, नृसिंहवाडी 54.6 फूट अशी आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.