** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, August 15, 2020

राधानगरीतून 1400 तर अलमट्टीतून 108505 क्युसेक विसर्ग सुरू

 


 

            कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) :  राधानगरी धरणात 236.24 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणातून 1400 तर अलमट्टी धरणातून 108505 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प व जंगमहट्टी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

पंचगंगा नदीवरील-  शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, सरकारी कोगे व खडक कोगे. तुळशी नदीवरील बीड, कासारी नदीवरील- यवलूज. कुंभी नदीवरील- सांगरूळ, वारणा नदीवरील-चिंचोली, माणगांव व कोडोली, दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, सुळकूड व दत्तवाड असे एकूण 20 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 85.90 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 112.691 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 88.54 दलघमी, वारणा 866.68 दलघमी, दूधगंगा 651.17 दलघमी, कासारी 62.61 दलघमी, कडवी 70.68 दलघमी, कुंभी 63.96 दलघमी, पाटगाव 100.74 दलघमी, चिकोत्रा 32.45 दलघमी, चित्री 53.414 दलघमी, जंगमहट्टी 34.650 दलघमी, घटप्रभा  44.170  दलघमी, जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल पा) 6.060 दलघमी असा आहे.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 27.3 फूट, सुर्वे 27 फूट, रुई 57.2 फूट, इचलकरंजी 54 फूट, तेरवाड 50.9 फूट, शिरोळ 42.6 फूट, नृसिंहवाडी 41.3 फूट, राजापूर 33 फूट तर नजीकच्या सांगली 17.3  फूट व अंकली 21.8 फूट अशी आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.