रक्तपेढ्यांनी रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे
-सह आयुक्त एस.बी.पाटील
कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय): रक्ताचा तुटवडा भासू लागल्याने
जिल्ह्यातील प्रत्येक रक्तपेढ्यांनी किमान 3 ते 5 रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे,
अशी सूचना पुणे विभागाचे अन्न औषध प्रशासन सह आयुक्त एस.बी. पाटील यांनी केली आहे.
कोव्हिड 19 च्या
परिस्थितीत रूग्णसंख्या वाढत असल्याने रूग्णांना आवश्यक रक्त व रक्तघटक तात्काळ
मिळणे अत्यंत गरजेचे आहे. यापूर्वी दिलेल्या सूचनांचे पालन करुन तात्काळ रक्तदान
शिबीरांचे आयोजन करावे, असे सर्व रक्तपेढ्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात श्री.
पाटील यांनी म्हटले आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.