** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, September 25, 2020

9 बंधारे पाण्याखाली राधानगरीतून 1000; अलमट्टीतून 46005 क्युसेक विसर्ग सुरू

 


            कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) :  राधानगरी धरणात 233.29 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणातून 1000 कोयनेतून 1050 तर अलमट्टी धरणातून 46005 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प, चिकोत्रा मध्यम प्रकल्प, दूधगंगा मोठा प्रकल्प, कुंभी मध्यम प्रकल्प व वारणा मोठा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ,  भोगावती नदीवरील खडक कोगे व दूधगंगा नदीवरील दत्तवाड असे एकूण नऊ बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 105.15 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 123.081 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 98.10 दलघमी, वारणा 974. 19 दलघमी, दूधगंगा 719.12 दलघमी, कासारी 78.04 दलघमी, कडवी 69.55 दलघमी, कुंभी 76.52 दलघमी, पाटगाव 105.242 दलघमी, चिकोत्रा 43.115 दलघमी, चित्री 53.414 दलघमी, जंगमहट्टी 34.651 दलघमी, घटप्रभा  44.170 दलघमी, जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल. पा.) 6.06 दलघमी असा आहे.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 17.9, सुर्वे 18.7 फूट, रुई 45.6 फूट, इचलकरंजी 42 फूट, तेरवाड 40.6 फूट, शिरोळ 33 फूट, नृसिंहवाडी 27 फूट, राजापूर 19.6 फूट तर नजीकच्या सांगली 10.3  फूट व अंकली  11.10 फूट अशी आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.