** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, June 25, 2021

2 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 2402 क्युसेक विसर्ग

 


          कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 86.21 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1300 व सिंचन विमोचकातून 1102 असा एकूण 2402 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- रुई व इचलकरंजी असे 2 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 41.86 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 89.268 इतका पाणीसाठा आहे.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 51.55 दलघमी, वारणा 524.21 दलघमी, दूधगंगा 278.70 दलघमी, कासारी 30.16 दलघमी, कडवी 31.34 दलघमी, कुंभी 39.77 दलघमी, पाटगाव 49.02 दलघमी, चिकोत्रा 22.30 दलघमी, चित्री 33.52 दलघमी, जंगमहट्टी 14.43 दलघमी, घटप्रभा  42.85 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, आंबेआहोळ 15.80 दलघमी, कोदे (ल.पा) पुर्ण क्षमतेने भरला आहे.

          तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 15.3 फूट, सुर्वे 17.10 फूट, रुई 43.3 फूट, इचलकरंजी 41 फूट, तेरवाड 38.9 फूट, शिरोळ 30 फूट, नृसिंहवाडी 26 फूट, राजापूर 17.6 फूट तर नजीकच्या सांगली 9.6 फूट व अंकली 9.10  फूट अशी आहे.

00000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.