** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, June 20, 2021

44 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1300 क्युसेक विसर्ग

 


 


          कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 87.31 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, शिरोळ व तेरवाड, भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, खडग कोगे व सरकारी कोगे,  तुळशी नदीवरील आरे व बीड, कासारी नदीवरील यवलूज, ठाणे आळवे व पुनाळ तिरपण,  कुंभी नदीवरील  कळे, वारणा नदीवरील चिंचोली, खोची व तांदूळवाडी,  दुधगंगा नदीवरील सिंध्दनेर्ली, सुळकुड, बाचणी व दत्तवाड, वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, गारगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, सुरूपली, चिखली  व शेणगाव, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव, ऐनापूर, निलजी, गिजवणे, चांदेवाडी व हरळी,  घटप्रभा नदीवरील पिळणी व बिजूरभोगोली, ताम्रपर्णी नदीवरील हल्लारवाडी, चंदगड व कुर्तनवाडी  असे एकूण 44 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 39.71 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 51.407  इतका पाणीसाठा आहे.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 52.28 दलघमी, वारणा 493.48 दलघमी, दूधगंगा 267.56 दलघमी, कासारी 29.57 दलघमी, कडवी 31.67 दलघमी, कुंभी 38.13 दलघमी, पाटगाव 51.49 दलघमी, चिकोत्रा 21.07 दलघमी, चित्री 30.95 दलघमी, जंगमहट्टी 13.98 दलघमी, घटप्रभा  44.17 दलघमी, आंबेआहोळ 14.09, कोदे (ल.पा) 5.23 दलघमी तर जांबरे मध्यम प्रकल्प दि. 18 जून रोजी दु. 2.45 वा. पूर्ण क्षमतेने भरला आहे.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 34.1 फूट, सुर्वे 33 फूट, रुई 63.7 फूट, इचलकरंजी 59.5 तेरवाड 54.6 फूट, शिरोळ 49 फूट, नृसिंहवाडी 48.9 फूट, राजापूर 35.3 फूट तर नजीकच्या सांगली 20.5 फूट व अंकली 25.11  फूट अशी आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.