** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, May 22, 2020

आजअखेर 29 हजार 706 मजूर कोल्हापुरातून रवाना आज उत्तरप्रदेशकडे 1 हजार 447 तर बिहारकडे 882 मजूर रवाना



 
            कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : आजअखेर एकूण 22 रेल्वेमधून 29 हजार 706 मजूर जिल्ह्यामधून मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे रवाना झाले आहेत.
             ‘भारत माता की जय!’ अशा घोषणा देत लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेले उत्तरप्रदेशमधील इटावाकडे आज दुपारी 1 वाजता 1 हजार 447 मजूर तर 882 मजूर सायंकाळी 6 वाजता श्रमिक विशेष रेल्वेने बिहारकडे रवाना झाले.
            उत्तरप्रदेशमधील इटावाकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये हातकणंगलेमधील 430, करवीरमधील 70, इचलकरंजीमधील 400, आजरामधील 60, कागलमधील 60, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 400 व इतर भागातील 27 असे एकूण 1 हजार 447 मजुरांचा यामध्ये समावेश आहे.
            बिहारकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये गडहिंग्लजमधील 11, हातकणंगलेमधील 351, इस्लापूरमधील (सांगली) 61, इचलकरंजीमधील 233, कागलमधील 43, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 43 व करवीरमधील 140 असे एकूण 882 मजुरांचा यामध्ये समावेश आहे.
                       
000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.