** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, September 5, 2020

राधानगरीतून 400; अलमट्टीतून 41839 क्युसेक विसर्ग सुरू

 


 

                कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय) :  राधानगरी धरणात 225.735 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणातून 400 तर अलमट्टी धरणातून 41839 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प, पाटगाव मध्यम प्रकल्प, कासारी मध्यम प्रकल्प, तुळशी मोठा प्रकल्प व चिकोत्रा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पंचगंगा नदीवरील- रूई व इचलकरंजी असे एकूण 2 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 102.770 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 123.081 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 98.101 दलघमी, वारणा 951.761 दलघमी, दूधगंगा 715.049 दलघमी, कासारी 78.565 दलघमी, कडवी 71.240 दलघमी, कुंभी 73.260 दलघमी, पाटगाव 105.100 दलघमी, चिकोत्रा 43.115 दलघमी, चित्री 53.385 दलघमी, जंगमहट्टी 34.650 दलघमी, घटप्रभा  41.542 दलघमी, जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल. पा.) 6.060 दलघमी असा आहे.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 15.7 फूट, सुर्वे 17.4 फूट, रुई 43.6 फूट, इचलकरंजी 41 फूट, तेरवाड 39.6 फूट, शिरोळ 31.6 फूट, नृसिंहवाडी 28 फूट, राजापूर 16.9 फूट तर नजीकच्या सांगली 7.6  फूट व अंकली 9.2 फूट अशी आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.