कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : केंद्र शासनाने सन
2015 मध्ये ‘स्टँड अप इंडिया’ योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत सिडबीने या
रक्कमेची सुरक्षा हमी कवच तयार केले असून लाभार्थ्यांना जे कर्ज दिले जाते त्याला
सिडबी हमी देईल, असे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी कळविले
आहे.
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी त्यांचा स्वहिस्सा म्हणून
प्रकल्प किंमतीच्या 25 टक्के रक्कम द्यावी. केंद्र शासनाच्या स्टँड अप
इंडिया या योजनेचा लाभ घेऊन प्रकल्पाची उभारणी केली आहे, अशा अनुसूचित जाती व
नवबौध्द समाजातील घटक उद्योजकांना 15 टक्के मार्जिन मनी राज्य शासन उपलब्ध करुन
देणार आहे.
या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती
घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजकांनी 10 टक्के
स्वहिस्सा भरणा केल्या नंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत 75
टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित मार्जिन मनी 15 टक्के राज्य शासनामार्फत
देण्यात येईल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी समाज कल्याण
कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. लोंढे यांनी पत्रकाद्वारे
केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.