कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 171.59 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार कोयनेतून
1139 तर अलमट्टी धरणातून 6922 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम
प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.
पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी, शिंगणापूर व रूई, भोगावती नदीवरील –खडक कोगे व वारणा नदीवरील-चिंचोली असे एकूण पाच
बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 54.204
टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 91.130 इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये पुढीलप्रमाणे
पाणीसाठा आहे. तुळशी 56.59 दलघमी, वारणा 677.42 दलघमी, दूधगंगा 494.07 दलघमी,
कासारी 55.37 दलघमी, कडवी 43.29 दलघमी, कुंभी 56 दलघमी, पाटगाव 79.75 दलघमी,
चिकोत्रा 23.20 दलघमी, चित्री 29.91 दलघमी, जंगमहट्टी 25.49 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल पा) 6.06
दलघमी असा आहे.
तसेच
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 15.1 फूट, सुर्वे 14.10 फूट,
रुई 42.6 फूट, इचलकरंजी 37.6 फूट, तेरवाड 34.6 फूट, शिरोळ 26.6 फूट, नृसिंहवाडी 21
फूट, राजापूर 10 फूट तर नजीकच्या सांगली 4.3 फूट व अंकली 3.7 फूट अशी आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.