कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय)
: जिल्ह्यातील राधानगरी धरणात 72.66 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार
राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1100 तर सिंचन विमोचकातून 514 क्युसेक
पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- रुई व इचलकरंजी असे 2 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 43.53
टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 89.933 इतका
पाणीसाठा आहे.
आपल्या
जिल्ह्यातील धरणांमध्ये
पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 50.17 दलघमी, वारणा 540.07 दलघमी, दूधगंगा 278.30
दलघमी, कासारी 30.46 दलघमी, कडवी 31.67 दलघमी, कुंभी 39.12 दलघमी, पाटगाव 48.73
दलघमी, चिकोत्रा 22.57 दलघमी, चित्री 32.23 दलघमी, जंगमहट्टी 13.98 दलघमी, घटप्रभा 42.73 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी,
आंबेआहोळ 16.12, कोदे (ल.पा) पुर्ण क्षमतेने भरला आहे.
तसेच
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 14.7 फूट, सुर्वे 17 फूट, रुई 43
फूट, इचलकरंजी 40 तेरवाड 38.3 फूट, शिरोळ 29.3 फूट, नृसिंहवाडी 25.9 फूट, राजापूर 16
फूट तर नजीकच्या सांगली 8.9 फूट व अंकली 8.6
फूट अशी आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.