इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २५ जून, २०२१

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या उन्नतीसाठी महत्वपूर्ण योजना

 



             राज्य शासनाच्या सामाजिक न्यायविभागामार्फत अनुसूचित जाती नवबौध्द घटकांसाठी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविल्या जातात. अनुसूचित जाती उपयोजनेच्या माध्यमातून एकूण 19 इतर शासकीय कार्यान्वयीन यंत्रणांच्या माध्यमातून 56 योजनांच्या अनुषंगाने निधी वितरीत केला जातो. सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये इतर शासकीय यंत्रणाना 113.97 कोटी रूपये निधी कोल्हापूर जिल्ह्यासाठी वितरीत करण्यात आला आहे, समाज कल्याण विभागामार्फत जिल्ह्यात सन 2020-21 मध्ये राबविण्यात आलेल्या योजनांबाबत समाज कल्याण विभागाचे कोल्हापूर जिल्हा सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांच्याशी माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी साधलेला संवाद...

          सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेता यावे तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी  भारत सरकार शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क इतर तत्सम शिष्यवृत्तीच्या महत्वाकांक्षी योजना राबविल्या जातात. या योजनेंतर्गत 34 हजार विद्यार्थ्यांना वर्षभरामध्ये लाभ देण्यात आला आहे.

          अनुसूचित जाती नवबौध्द कुटुंबांचे राहणीमान उंचवावे त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा यासाठी ग्रामीण शहरी भागामध्ये रमाई आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (वैयक्तिक) धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजना अशा योजनांतर्गत पक्के घर बांधून देण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते. या योजनेमार्फत 2 हजार 183 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. जातीयतेच्या कारणावरुन अत्याचाराला बळी पडलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या 105 पिडीतांना वर्षभरात 141.06 लक्ष रुपये अर्थसहाय्य देवून त्यांचे पुनर्वसन केले आहे.

          जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीच्या व्यक्ती चामडयाच्या वस्तु पादत्राणे दुरुस्ती या व्यवसायाच्या माध्यमातून उपजीविका करीत असतात. ऊन, वारा, पाऊस यापासून त्यांचे संरक्षण व्हावे तसेच त्यांची आर्थिक सामाजिक उन्नती व्हावी यासाठी या व्यवसायातील अनुसूचित जातीच्या 146 कामगारांना पत्र्याचे गटई स्टॉल मंजूर करण्यात आले आहेत.

          सहकाराच्या माध्यमातुन अनुसूचित जाती नवबौध्द घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने या घटकातील यंत्रमाग, निटींग गारमेंटस, सुत प्रोसेसिंग युनिटस, शेती माल प्रक्रीया, साखर कारखाने, खांडसरी कारखाना तत्सम उदयोगांना,   औद्योगिक संस्थांना अर्थसहाय्य दिले जाते. पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील भुमीहीन अनुसूचित जाती नवबौध्द शेतमजूर कुटुंबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे, त्यांच्या राहणीमानात सुधारणा व्हावी  मजुरीवर असलेल्यांचे अवलंबित्व कमी व्हावे या उद्देशाने सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत ही योजना राबविण्यात येते.

          डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना, अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर त्यांची उपसाधने पुरविणे योजना अनुसूचित जातीच्या नवउद्योजकांना केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया या योजनेंतर्गत मार्जिन मनी उपलब्ध करुन देणे, तृतीय पंथीयांचे हक्काचे संरक्षण कल्याण योजना, ज्येष्ठ नागरीकांच्या कल्याणार्थ चरितार्थ त्यांचे जीवन सुसहय व्हावे, शारिरीक / मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, यासाठी राज्याचे सर्व समावेश धोरण राबविणे . महत्वकांक्षी योजनांची अंमलबजणी केली जाते.

          सामाजिक न्याय विभागांतर्गत जिल्हयामध्ये अनुसूचित जाती नवबौध्द मुलां/मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी याकरिता 18 शासकीय वसतिगृहे 4 शासकीय निवासी शाळा 23 विमुक्तजाती भटक्या जमातीच्या आश्रमशाळा आहेत. वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र असलेल्या परंतु वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो. या आर्थिक वर्षामध्ये 167 इतक्या विद्यार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात आला आहे. समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा अधिकाधिक विद्यार्थी नागरिकांनी लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी विहीत मुदतीत अर्ज/ प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.

        

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.