कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्था
मर्या, कोल्हापूर यांच्याकडून रुपये 1 लाख 42 हजार इतक्या रक्कमेच्या वसुलीसाठी क
करवीर सि.स.नं. 1055 ब, ए वॉर्ड पैकी महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
कोल्हापूर यांच्या हिस्सेचे क्षेत्र रक्कम वसूल करण्यासाठी स्थावर संपत्ती जप्त करण्यात
आली आहे. विक्रीसाठी निश्चित केलेल्या दिवसापूर्वी पूर्वोवत एकूण रुपये 1 लाख 42 हजार
अधिक व्याज जमा केले नाही तर जप्त मालमत्ता तहसिलदार कार्यालय, करवीर येथे दि. 28
सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता किंवा दुपारी 3 वाजता जाहिर लिलावाने विकली जाईल,
असे करवीरच्या तहसिलदार शीतल मुळे- भामरे
यांनी कळविले आहे.
लिलावाच्या शर्ती पुढीलप्रमाणे-
१. क करवीर रि.स.नं. १०५५ ब
पैकी महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्था, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांच्या
हिस्स्याचे क्षेत्र ०.२०.०० चौ.मी. या मालमत्तेची मुल्यांकन किंमत रु. १० लाख ७२
हजार ६०० या मालमत्तेच्या मुल्यांकन इतकी
असून यापेक्षा कमी बोली स्विकारली जाणार नाही.
2. लिलाव मंजूर अंतरावर पूर्ण केला जाईल.
3. ज्यांच्या नावे लिलाव पूर्ण होईल त्याने 1/4 रक्कम
तात्काळ भरावयाची आहे.
4.लिलाव मंजूर झाल्यानंतर तीन दिवसात उर्वरित ३/४ रक्कम जमा करायची आहे.
५. उर्वरित ३/४ रक्कम जमा न केल्यास फेरलिलाव केला जाईल व त्यात बोली कमी
आल्यास अशी कमी पडणारी रक्कम पूर्वी जमा केलेल्या १/४ रकमेतून वजा केली जाईल.
६. थकबाकीदाराने लिलाव पुकारल्यानंतर ३० दिवसाच्या आत संपूर्ण थकबाकी,
नोटीस फी, लिलाव पुकारलेचा खर्च इत्यादी खर्च जमा करून लिलाव रद्द करण्यास सक्षम
अधिकाऱ्याकडे विनंती केल्यास लिलाव ज्याच्या नावे मंजूरी अंतरावर पूर्ण केला आहे.
त्यास बोली रक्कमेच्या ५ टक्के रक्कम मानधन म्हणून अदा करावी लागेल.
७. सक्षम अधिकाऱ्याकडून लिलाव मंजूर झाल्यानंतर विक्री प्रमाणपत्र दिले
जाईल त्या आधारे लिलाव धारकास
मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा देण्यात येईल.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.