कोल्हापूर, दि.15(जिमाका):
स्वातंत्र्यसंग्रामाची माहिती देणारे छायाचित्र व साहित्य प्रदर्शन नव्या पिढीला स्वातंत्र्य
सेनानींच्या बलिदानाची, त्यागाची जाणीव करुन देणारे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी
राहुल रेखावार यांनी केले.
राजाराम
कॉलेजचा इतिहास विभाग व स्वातंत्र्यसंग्राम संग्रह ट्रस्टच्या वतीने शाहू स्मारक भवन
येथे स्वातंत्र्य संग्रामातील घटनांशी संबंधित दुर्मिळ छायाचित्रे व साहित्यांच्या
प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते झाले. यावेळी कॉलेजचे
प्राचार्य डॉ.महाराज पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष राजेश महाराज, इतिहास विभाग प्रमुख डॉ.
ऋषिकेश दळवी यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
स्वातंत्र्य
संग्रामाचा इतिहास डोळ्यासमोर आणणारे हे प्रदर्शन पाहून विद्यार्थी व नागरिकांना स्वातंत्र्यसंग्रामातील
घटनांची माहिती होईल, असा विश्वासही जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र्यसंग्रामातील
विविध घटनांचे साक्षीदार असलेली दुर्मिळ छायाचित्रे, पत्रव्यवहार, वस्तू, शस्त्रे,
स्वातंत्र्य संग्रामाचे स्मृतीचिन्ह, आझाद हिंद फौज, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे,
महात्मा गांधीजी यांच्यासह अनेक स्वातंत्र्य सेनानींची छायाचित्रेही याप्रदर्शनात लावण्यात
आली आहेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.