कोल्हापूर,दि. 28 (जिमाका) : सर्व
बालगृहातील मुला-मुलींनी सुविधांचा लाभ घेऊन शुन्यातून विश्व निर्माण करुन जीवनात
आदर्श निर्माण करावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह
चव्हाण यांनी चाचा नेहरु बाल महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी केले.
विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या कार्यक्रमास जिल्हा क्रीडा
अधिकारी चंद्रशेखर साखरे, जिल्हा परिवक्षा अनुरक्षण संघटनेच्या मानद कार्यवाह पद्मजा
तिवले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील, बाल कल्याण समितीच्या
अध्यक्ष वैशाली बुटाले, बाल कल्याण समिती सदस्य शिल्पा सुतार, अश्विनी खाडे,
श्रीमती गारे तसेच बाल न्याय मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
परिवक्षा अनुरक्षण संघटनेच्या मानद कार्यवाह पद्मजा तिवले
म्हणाल्या, मागील तीन वर्षात महोत्सव घेता आला नाही. सध्या घेण्यात आलेला महोत्सव
सर्व मुलांनी मनापासून आनंदाने साजरा करावा.
2018 नंतर प्रथमच या
क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील महिला बाल विकास विभागाच्या
नऊ बालगृहातील 350 मुले- मुली सहभागी झाली आहेत. हा महोत्सव तीन दिवस चालणार आहे.
यामध्ये खो-खो, कबड्डी, धावणे, कॅरम, बुध्दीबळ या खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. तसेच
दोन दिवस सांस्कृतिक आणि मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
कार्यक्रमास सर्व संस्था अधीक्षक, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी
कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.