कोल्हापूर दि. 26 : स्वच्छ
भारत मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे उल्लेखणीय काम झाले असून स्वच्छतेवर आधारित देलेल्या
गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानावर आला आहे. येत्या 2 ऑक्टेाबर रोजी राष्ट्रीय स्तरावर होणा-या कार्यक्रमात स्वच्छता
दर्पण पुरस्काराने कोल्हापूर जिल्हयास गौरविले जाणार आहे.
2 ऑक्टोबर,2017 या
महात्मा गांधी जयंती निमित्ताने केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयामार्फत स्वच्छता दर्पण
पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होणा-या कामांवर
आधारित याचे गुणांकन केले गेले असून यामध्ये कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम
स्थानावर आहे.
स्वच्छतेवर आधारित
देलेल्या गुणांकनानुसार जिल्हयाला 90 % इतके गुण मिळाले आहेत.दि.25 सप्टेंबर,2017
रोजी पर्यंत झालेल्या कामगिरीवर हे गुणांकन ठरले आहे. केंद्र शासनाकडून या
स्पर्धेसाठी कामगिरी, शाश्वत्ता आणि पारदर्शकता या तीन घटकांवर आधारित जिल्हयांचे
गुणांकन केले आहे. कोल्हापूर जिल्हयाला कामगिरीमध्ये 50 पैकी 50 गुण मिळाले आहेत
तसेच शाश्वत्ता या घटकासाठी 25 पैकी 15 गुण मिळाले आहेत तसेच पारदर्शकतेसाठी 25
पैकी 25 गुण मिळाले आहेत.
स्वच्छता दर्पण
पुरस्कारासाठी पुणे विभागातील कोल्हापूर,सांगली व सातारा हे तीन ही जिल्हे प्रथम
क्रमांकावर आहेत.या उत्कृष्ट काम केलेल्या जिल्हयांचा 2 ऑक्टेाबर,2017 रोजी
राष्ट्रीय स्तरावर होणा-या कार्यक्रमावेळी गौरव केला जाणार आहे.
कोल्हापूर जिल्हा प्रथम
स्थानावर येण्यासाठी जिल्हास्तरावर पाणी व स्वच्छता विभाग, तालुकास्तर गटविकास
अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रा.पं),गटसंसाधन केंद्रातील कर्मचारी, आणि ग्राम
पंचायत स्तरावर ग्रामसेवक आणि ग्राम पंचायत कर्मचा-यांनी मेहनत घेतली. या
कामगिरीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांचे मार्गदर्शन लाभले. तर
काम वेळेत पुर्ण करून घेण्यासाठी उपमुख्य
कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई, व या विभागातील तज्ञ व सल्लागार यांनी
विशेष परिश्रम घेतले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.