इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, १ जानेवारी, २०१७

शेतकरी वर्गाला केंद्रबिंदू ठेवून विकास सोसायट्या सक्षम करणे आवश्यक सहकार मंत्री – सुभाष देशमुख





कृषिवर आधारीत पुरक उद्योधंद्याच्या निर्मितीला चालना मिळणे आवश्यक
                                           - मसहूल मंत्री चंद्रकांत पाटील
कोल्हापूर दि 01- सहकारातून महाराष्ट्र समृद्ध करावयाचा असेल तर ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला केंद्रबिंदू ठेवून विकास सोसायट्या सक्षम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
केशवराव नाट्यगृह येथे आयोजित दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई  शेड्युल्ड बँक शाखेच्या उद्घाटन सोहळा समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई या शिखर बँकेच्या व्हीनस कॉर्नर येथील नूतन शाखेचे सहकारमंत्री सुभाष देशमुख तसेच  महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन करण्यात आले.
शेतकरी हा अर्थकारणाचा कणा आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विकास सोसायटीच्या  माध्यमातून सुलभ अल्पदरात कर्ज उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र सहकार क्षेत्र अडचणीत असल्यामुळे याबाबत योग्य नियोजन करून विकास सोसायट्या सक्षमपणे उभा करणे आवश्यक आहे. यादृष्टीने शिखर बँकेने विशेष प्रयत्न करायला हवेत. कृषि उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री केंद्र यांच्या मुलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता शिखर बँकेने प्रयत्न करावेत. यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. शासनाने शेतमाल तारण योजना सुरु केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यांसारख्या योजनांना चालना मिळणे आवश्यक असून या पार्श्वभूमीवर दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई  शेड्युल्ड बँक या शिखर बँकेची शाखा कोल्हापूर सारख्या कृषिप्रधान जिल्ह्यात सुरु होत आहे हे अभिनंदनीय आहे. सभासद हे सहकारी संस्थांचे खऱ्या अर्थाने मालक आहेत. त्यामुळे सभासदांनी जागृत राहणे आवश्यक असल्याचे मत यावेळी बोलताना सहकार मंत्र सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.
कृषिवर आधारीत पुरक उद्योधंद्याच्या निर्मितीला चालना मिळणे आवश्यक
                                           - मसहूल मंत्री चंद्रकांत पाटील
महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीत  सुधारणा झाली, शेतकरी समृद्ध झाला तर देशाच्या उत्पादनविकासात वाढ होणार आहे. त्यासाठी कृषीवर आधारित पूरक उद्योगधंदे व कारखान्यांना चालना मिळणे आवश्यक आहे. दक्षिण महाराष्ट्रात ज्याप्रमाणे उसावर आधारित साखर उद्योग विकसित झाला त्याच प्रमाणे केवळ उसच  नव्हेतर इतरही कृषीउत्पादनांवर आधारित उद्योगधंद्यांची निर्मिती होणे आवश्यक आहे. दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई  या शिखर बँकेने कृषीवर आधारित उद्योगधंद्यांसाठी त्यादृष्टीने विविध प्रोजेक्ट तयार करून  अल्पदरात कर्ज उपलब्ध करून द्यावे. यासाठी शिखर बँकेने स्वत: पुढाकार घेवून  ग्रामीण भागातील तरुणांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. असे मत महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

 00 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.