कोल्हापूर येथील पोलीस उद्यानाजवळ केएसबीपी ट्रॅफिक पार्क साकारण्यात
आला असून याचे उदघाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
उद्योग शेती, विकास बरोबरच कोल्हापूरच्या पर्यटन वाढीला चालना
देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यात केएसबीपी ट्रॅफिक पार्कमुळे अधिक
भर पडली आहे. असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, लहानपणापासूनच ट्रॅफिकचे
नियमांबाबत जाणीव जागृती झाली तर रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होईल त्यादृष्टीने हे पार्क
अधिक महत्वपूर्ण ठरेल. यावेळी त्यांनी आपल्या वाढदिनानिमित्त दुष्काळग्रस्त 28 हजार
गावांमधून मुलींच्या शिक्षणासाठी निधी संकलित करण्याचा संकल्प करुन 50 हजार महाविद्यालयीन
मुलींना कपडे, नऊ महीन्यासाठी बसचा पास, बूट देण्याचे उदिदष्ट असल्याचे सांगितले.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.