इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, ३० जून, २०१९

जिल्ह्यातील राधानगरी धरणात ५५.१२ दलघमी पाणीसाठा


कोल्हापूर,दि.३०,(जि.मा.का.) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात आज अखेर ५५.१२ दलघमी पाणीसाठा आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इ भोगावती नदीवरील खडक कोगे हे सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
            आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी २९.०५ दलघमी, वारणा २३८.६० दलघमी, दूधगंगा ६०.२९ दलघमी, कासारी १६.९६ दलघमी, कडवी २७.७२दलघमी, कुंभी २१.२०दलघमी, पाटगाव २७.६६ दलघमी, चिकोत्रा १२.०९ दलघमी, चित्री ७.८७ दलघमी, जंगमहट्टी ४.३८ दलघमी, घटप्रभा  ३१.७६ दलघमी, जांबरे २.२७ दलघमी, कोदे (ल पा) १.६४ दलघमी असा आहे.
  तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम २०.६ फूट, सुर्वे १९ फूट, रुई ४६.६ फूट, इचलकरंजी ४३.६ फूट, तेरवाड ३६.६ फूट, शिरोळ २८ फूट, नृसिंहवाडी २० फूट, राजापूर १७ फूट तर नजीकच्या सांगली ७ फूट आणि अंकली ७.७ फूट अशी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.