बुधवार, २१ ऑक्टोबर, २०१५

निसर्ग पर्यटन अंतर्गत राधानगरीसाठी 34 लाख निधी मंजूर

            कोल्हापूर, दि. 21 : सन 2015-16 राज्यस्तरीय योजनेअंतर्गत निसर्ग पर्यटन योजना (24062295) या लेखाशिर्षांतर्गत 51 कोटी इतका नियतव्यय अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे. योजनेतील रु 20 कोटी इतका नियतव्यय संरक्षित क्षेत्राकरिता मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई यांचया अखत्यारित येणाऱ्या राधानगरी अभयारण्यासाठी 34 लाख 70 हजार रुपयाचा निधी तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी 60 लाखाचा निधी देण्यात येणार आहे.
            सन 2015-16 या आर्थिक वर्षात आतापर्यंत निसर्ग पर्यटन योजना (24062295) या योजनेअंतर्गत विविध शासन निर्णयान्वये 24 कोटी 12 लाख निधी वितरीत करण्यात आला आहे. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) नागपूर यांनी सादर केलेल्या प्रस्तावापैकी निसर्ग पर्यटन तज्ञ समितीने पर्यटन आराखड्यास मंजूरी दिल्याप्रमाणे एकूण 94 कोटी 79 लाख कार्यबाबीकरीता निधीला मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यामधील राधानगरी अभयारण्यासाठी देण्यात येणाऱ्या 34 लाख 70 हजार रुपयाच्या निधीतून दाजीपूर येथील विश्रामगृहाची दुरुस्ती, ठक्याचा वाडा येथे पर्यटकांसाठी तंबु निवासाची व्यवस्था, तंबु खरेदी करणे, तंबु कुटीसाठी अंतर्गत फर्निचर, कपाट, बेड, सोलर व्यवस्था इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. सह्याद्री
            कामे करताना भारतीय वन अधिनियम 1927 वन्यजीव (संरक्षण) अधिनिमय 1972 व वन (संवर्धन) अधिनियम 1980 चा भंग होणार नाही या अटीवर मंजूरी देण्यात आली आहे. केंद्र शासन व राज्य शासनाचे निसर्ग पर्यटन धोरणाशी अनुकूल राहतील अशीच कामे कार्यान्वित करावी. प्रस्तावित कार्यबाबींचा समावेश संबंधित संरक्षित क्षेत्रांच्या सर्वंकष पर्यटन आराखड्यात करण्यात यावा.
            शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचा संकेताक 20151021151119219 असा आहे.

0 0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.