बुधवार, १ जुलै, २०२०

1 बंधारा पाण्याखाली कोयनेतून 2111 क्युसेक विसर्ग सुरू



          कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 75.61 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार कोयना धरणातून 2111 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी हा 1 बंधारा पाण्याखाली आहे. तसेच आज, कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. नजिकच्या कोयना धरणात 31.99 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 68.149 इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 42.11 दलघमी, वारणा 401.30 दलघमी, दूधगंगा 283.92 दलघमी, कासारी 30.46 दलघमी, कडवी 25.23 दलघमी, कुंभी 32.01 दलघमी, पाटगाव 39.69 दलघमी, चिकोत्रा 16.83 दलघमी, चित्री 15.08 दलघमी, जंगमहट्टी 9.04 दलघमी, घटप्रभा  43.98 दलघमी, जांबरे 16.85 दलघमी, कोदे (ल पा) 6.06 दलघमी असा आहे.
           तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 11.5 फूट, सुर्वे 12.8 फूट, रुई 39.8 फूट, इचलकरंजी 35 फूट, तेरवाड 34.6 फूट, शिरोळ 27.9 फूट, नृसिंहवाडी 20.9 फूट, राजापूर 11.6 फूट तर नजीकच्या सांगली 7 फूट व अंकली 6.3 फूट अशी आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.