कोल्हापूर, दि. 3 : फिरत्या विधी सेवा तथा लोक अदालतमुळे समाजातील तंटे सामंजस्याने सुटण्यास मदत होणार असून या उपक्रमाच्या माध्यमातून न्याय व्यवस्था अधिकाधिक लोकाभिमुख होण्यास चालना मिळेल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय येथे फिरत्या विधी सेवा तथा लोकअदालत मोबाईल व्हॅनच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा न्यायाधीश एस.पी.कुलकर्णी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश जी.एम.टंकसाळी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. उमेशचंद्र मोरे, श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मानसिंग बोंद्रे, संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब भुयेकर-पाटील, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एच.एस.व्हनमोरे, उपवन संरक्षक प्रभुनाथ शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले, तसेच वृक्ष पुजन करुन फिरते विधी सेवा तथा लोक अदालत मोबाईल व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.
आज विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारत पुढे जात आहे. त्या अनुषंगाने लोकशाहीच्या स्तंभांवर मोठी जबाबदारी पडली असून यामध्ये न्यायपालिकेची भुमिका अत्यंत महत्वाची आहे. त्या अनुषंगाने फिरत्या लोक न्यायालयासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून न्याय व्यवस्था लोकाभिमुख होत आहे हे अत्यंत स्तुत्य म्हणावे लागेल. भारतीय न्याय व्यवस्थाही बुध्दी व विवेक यांचा जाणिवपूर्वक वापर करणारी जगातील एकमेव न्याय व्यवस्था आहे, असे मतही कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केले.
फिरते लोक अदालत स्तुत्य उपक्रम .. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी ü
जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, जनतेला न्यायासाठी न्यायालयापर्यंत जावे लागते यामध्ये वेळ, पैसा व श्रम यांचा मोठ्या प्रमाणात अपव्य होतो. त्या अनुषंगाने समाजामध्ये तंटे उद्भूवनयेत तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी
या करीता महात्मा गांधी तंटामुक्तीसारखी मोहिम शासनाने हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर फिरते विधी सेवा तथा लोक अदालत सारखा उपक्रम जिल्ह्यात सुरु होत आहे हे स्तुत्य म्हणावे
लागेल. महात्मा गांधी तंटामुक्ती उपक्रमाला हा उपक्रम निश्चितीच पुरक ठरेल अशी अशा जिल्हाधिकरी डॉ. अमित सैनी यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे म्हणाले, न्याय मागण्याकरीता जेव्हा सामान्य व्यक्ती न्यायालयाचा दरवाजा ठोठावते तेव्हा न्यायालयीन प्रक्रियेमुळे तीला एखाद्या चक्रव्युव्हात अडकल्यासारखे वाटू लागते. फिरत्या विधा सेवा तथा लोक अदालतमुळे या चक्रव्युव्हापासून सामान्य व्यक्ती दूर राहण्यास मदत होणार आहे. सामाजातील बहुतांशी तंटे सामजस्य
व तडजोडीतून सुटण्यास मदत झाली तर कायदा व सुव्यवस्थेबरोबरच पोलीस खात्यावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच जिल्हा न्यायाधीस एस.पी.कुलकर्णी
म्हणाले, लोक अदालत ही संकल्पना समाजामध्ये हळूहळू रुजत असून यामुळे छोटे छोटे अनेक तंटे प्रस्तापित न्यायालयीन प्रक्रियेत न लांबता सामंजस्य व तडजोडीतून सुटण्यास मदत मिळत आहे. शिवाय सामंजस्य व तडजोडीतून प्रकरणे निकाली काढली जात असल्यामुळे दोन्ही पक्षांना आपल्यावर अन्याय झाला असे वाटणार नाही.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांनी केले. तर स्वागत प्र. प्रा. डॉ.एच.एस.व्हनमोरे यांनी केले. कार्यक्रमोच सुत्रसंचालन प्रा. पंढरीनाथ पाटील तर आभार प्रा. डॉ. पांडुरंग पाटील यांनी मानले. यावेळी पक्षकार, विद्यार्थी, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.