कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात
127.14 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या
अहवालानुसार राधानगरी धरणातून 1350 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व
शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी
कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वालोली,
यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव व पेंडाखळे, कडवी नदीवरील-सवते सावर्डे, शिरगांव व सरुड पाटणे, वेदगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण
व वाघापूर, घटप्रभा नदीवरील- कानर्डे सावर्डे,
वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, कोडोली,
तांदूळवाडी, शिगांव व खोची, दुधगंगा नदीवरील-
दत्तवाड, सुळकुड व सिध्दनेर्ली, कुंभी नदीवरील-
शेणवडे व कळे, तुळशी नदीवरील- बीड
आरे व बाचणी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी
व चंदगड, धामणी नदीवरील- सुळे असे 42 बंधारे पाण्याखाली आहेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.