कोल्हापूर, दि. 13 : सर्व गावे डिजिटल
पेमेंट पध्दतीवर आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशिल असून डिजिटल पध्दतीने पेमेंट
करणाऱ्या 50 गावांना केंद्र शासनामार्फत पुरस्कार देण्यात येणार आहे. तर देशात
संपूर्ण डिजिटल होणाऱ्या 10 जिल्ह्यांना डिजिटल चँम्पियन म्हणून पुरस्कार देण्यात
येणार आहे. संपूर्ण देश कॅशलेसच्या संक्रमण अवस्थेतून जात असून डिजिटल पेमेंट
पध्दतीच्या प्रभावी वापरात आणि त्यासाठीच्या जनजागृतीत शासनाच्या सर्व विभागांनी
सक्रीय योगदान द्यावे, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी केले.
यावेळी
महानगरपालिका आयुक्त पी.शिवशंकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, माहिती
उपसंचालक सतीश लळीत, जिल्हा शल्य चिकित्सक एल.एस.पाटील, जिल्हा कोषागार अधिकारी
रमेश लिधडे, जिल्हा अग्रणी बँकेचे रवींद्र बार्शीकर यांच्यासह विविध अधिकारी
प्रतिनिधी उपस्थित होते.
कॅशलेस
अर्थव्यवस्थेमुळे कर चुकवेगिरी, भ्रष्टाचार, काळा पैसा यांना आळा बसणारा असून.
कररुपाने मिळणारा पैसा देशाच्या विकासात वापरण्यात येणार आहे व त्यातून मोठ्या
प्रमाणात विकास कामे होणार आहेत. राजस्थानमधील आज अनेक गावे संपूर्ण डिजिटल होत
आहेत अशा वेळी महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्यात या कामाचा वेग अधिक असणे आवश्यक
आहे, त्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणांनी आपले सक्रीय योगदान द्यावे. कोल्हापूर
जिल्हा डिजिटल चँम्पियन व्हावा आणि जिल्ह्यातील सर्व व्यवहार डिजिटल पेमेंट
पध्दतीने व्हावेत यासाठी शिक्षण विभागामार्फत विद्यालयीन, महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांच्या विविध कार्यशाळा घेण्यात याव्यात, तालुकास्तरावर शिक्षकांच्या
कार्यशाळा घेण्यात याव्यात. बँका, विविध शासकीय यंत्रणा यांनी यासाठी तरुणांचा
पुढाकार, सहभाग वाढवावा, सर्व विभागांनी जनतेत याबाबतची जागृती घडवून आणावी आणि
कार्डस्, युएसएसडी, एईपीएस, युपीआय, ई-वॉलेट या सारख्या डिजिटल प्रणालींचा दैनंदिन
व्यवहारात प्रभावी वापर करावा व त्यासाठी जनतेला उद्युक्त करावे, असे आवाहन
प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी केले.
00 0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.