इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २३ जून, २०२३

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात स्वातंत्र्यवीरांचे योगदान महत्वपूर्ण आनंदाराव पाटील 75 वर्ष पूर्ण ज्येष्ठ नागरिकांचा गारगोटीमध्ये सत्कार समारंभ संपन्न

 

            कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) : देश पारतंत्र्यात असताना अनेक थोर स्वातंत्र्यविरानी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये स्वातंत्र्यवीरांचे योगदान महत्वूपर्ण आहे.   

            यावेळी भारती विद्यापीठचे कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, पुणे तसेच मार्गदर्शनासाठी रवी देशपांडे सातारा यांची प्रमुख उपस्थित होते.

            इंग्रजांच्या काळामध्ये भारतीयांवर होणारा अत्याचार आणि त्या अत्याचाराचे साक्ष असणारे आम्ही ज्येष्ठ नागरिक याठिकाणी उपस्थित असल्याचे सांगून  स्वातंत्र्यपूर्वचा भारताचा इतिहास व स्वातंत्र्यानंतरचा भारताचा इतिहास ज्येष्ठ नागरिकांसमोर अध्यक्ष आनंदरावदादा पाटील यांनी  व्यक्त केला.

        भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली, देशाचा अमृत महोत्सव सध्या सर्वत्र साजरा होत आहे. याचे औचित्य साधून गारगोटी येथील ‘आम्ही गारगोटीकर’ संघाच्यावतीने अमृत महोत्सवी जेष्ठ नागरिक बंधू-भगिनींचा सत्कार सोहळा  इंदुबाई सांस्कृतिक भवन गारगोटी येथे झाला .सदर सत्कार समारंभासाठी गारगोटी भागातील ज्या वयाची 75 वर्षे पूर्ण झालेल्याज्येष्ठ नागरिकांचा  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा  निमित्त शाल व श्रीफळ देऊन सत्कार समारंभ करण्यात आला.

            या कार्यक्रमामध्ये रवी देशपांडे यांनी ज्येष्ठांचे आरोग्य करमणूक आणि निरोगी जीवनासाठी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती  दिली. पंचायत समिती भुदरगडचे विस्तार अधिकारी अमोल दबडे यांना शाहू पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचाही सत्कार  आम्ही गारगोटीकर यांच्यावतीने करण्यात आला.

             समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या .समाज कल्याण विभागाच्यावतीने तालुका समन्वयक सुरेखा डवर यांनी शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या योजना तसेच सामाजिक न्याय विभागामध्ये असणारा ज्येष्ठ नागरिक कक्षाबाबत माहिती दिली .राष्ट्रीय हेल्पलाइनबाबत सागर कोगले यांनी ज्येष्ठांना या हेल्पलाइनचा होणारा उपयोग याबाबत मार्गदर्शन केले . श्रीमती कल्पना पाटील यांनी ज्येष्ठांचे अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. 

            या कार्यक्रमासाठी बजरंग अण्णा देसाई , सरपंच,आनंदराव आबिटकर,  ग्रामीण रुग्णालय गारगोटीचे  डॉ.कदम, ग्रामपंचायत गारगोटीचे सरपंच संदेश भोपळे, समाज कल्याण विभागाच्या समाज कल्याण निरीक्षक कल्पना पाटील, सुरेखा डवर तसेच जन सेवा फाउंडेशनचे सागर कोगले, दिलीप पाटील व भागातील  200 हून अधिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.