कोल्हापूर दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोव्हिड 19 मुळे उद्भवलेल्या
संसर्गजन्य परिस्थितीमुळे या वर्षीचा दिपावली उत्सव साध्या पध्दतीने साजरा
करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत गृह विभागाचे उप सचिव संजय खेडेकर यांनी
मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील नागरिकांनी यंदाचा दिपावली
उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले
आहे.
गृह विभागाचे उप सचिव संजय खेडेकर यांनी केलेल्या
मार्गदर्शक सूचना - राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये अद्यापही कोरोनाचे रुग्ण
मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. चालू वर्षी कोव्हिड या संसर्गजन्य रोगाचा झालेला
प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या सात आठ महिन्यात आलेले सर्व धर्मीय सण/उत्सव
अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. या वर्षीया
दिपावली उत्सव कोव्हिड कालावधीत साजऱ्या केलेल्या अन्य उत्सवांप्रमाणेच पूर्ण
खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा.
कोव्हिड
संसर्गामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे अद्याप खुली करण्यात आलेली
नाहीत. त्यामुळे साजरा केला जाणारा दिपावली उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील
याची दक्षता घेण्यात यावी. उत्सव कालावधीत नागरिकांनी विशेष करुन ज्येष्ठ नागरिक
तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे. तसेच नागरिकांनी गर्दी
टाळावी व मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये, मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे
पालन करावे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग/संक्रमण वाढणार नाही.
दिपावली
हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवा दरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणावर
फटाक्यांची आतषबाणी करण्यात येते. त्यामुळे वायु व ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या
तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दिपावली उत्सवानंतर बराच कालावधीपर्यंत दिसून येतात. कोरोना आजारामुळे
परिणाम झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदुषणाचा थेट परिणाम होऊन
त्रास होण्याची भीती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी चालू वर्षी फटाके
फोडण्याचे टाळावे. त्याचा त्रास होऊ शकतो. त्याऐवजी दिव्यांची आरास मोठ्या
प्रमाणावर करुन उत्सव साजरा करावा.
या
उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उपक्रम/कार्यक्रम उदा. दिपावली पहाट आयोजित
करण्यात येऊ नयेत. आयोजित करावयाचे झाल्यास online, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे
त्याचे प्रसारण करावे.
सांस्कृतिक
कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे (उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य
देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ.आजार आणि त्यांचे
प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र त्या
ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊ नये. याची दक्षता
घेण्यात यावी.
कोव्हिड-19
या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण,
वैद्यकी शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी
वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच प्रत्यक्ष
उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास
त्यांचे देखील अनुपालन करावे, असेही परित्रकामध्ये नमुद आहे.
0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.